Browsed by
Month: October 2014

शहरं आखायला हवीत.

शहरं आखायला हवीत.

श्रीनगरमधे पाऊस संकटासारखा कोसळला. पाणीच पाणी साचलं. सारं श्रीनगर एक सरोवर झालं होतं. नॉर्मल वेळी आपण रस्त्यावर उभे रहातो, कठड्याला टेकून, पलिकडं दल सरोवर असतं. कठड्यावरून उडी मारून खाली उभ्या असलेल्या छोट्या होडक्यात बसायचं आणि दलच्या किनाऱ्याला पार्क केलेल्या हाऊस बोटीत जायचं. हे झालं नेहमीचं. २०१४ च्या पावसाळ्यात दल सरोवर आणि रस्ता यात फरकच राहिला नाही. सरोवर कुठलं आणि शहर कुठलं ते कळत नव्हतं.  सगळं शहर पाण्याखाली. इमारतींचा पहिला मजला पाण्याखाली. माणसं दुसऱ्या मजल्यावर आणि गच्चीत मुक्काम करून राहिली. कित्येक…

Read More Read More

पक्ष – आमदार आऊटसोर्स करणारी कंपनी. कंपनी सरकार चालवते.

पक्ष – आमदार आऊटसोर्स करणारी कंपनी. कंपनी सरकार चालवते.

पक्ष – आमदार आऊटसोर्स करणारी कंपनी. कंपनी  सरकार चालवते. ।। महाराष्ट्रातल्या मतदारांनी चार पक्षांमधे मतं विभागली. भाजपला २८ टक्के, सेनेला २० टक्के, काँग्रेसला १८ टक्के आणि राष्ट्रवादीला १७ टक्के मतं दिली. चारही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुक लढवली. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी मोडली होती, भाजप-सेनेची युती मोडली होती. म्हणजेच स्वतंत्रपणे या पक्षांना समाजात काय स्थान आहे ते सिद्ध झालं. मतं आणि जागा यांचं गणीत कधीच जुळत नाही. मतांच्या प्रमाणात जागा कधीच मिळत नाहीत. भाजपच्या  २८ टक्के मतांना २८ टक्के जागा म्हणजे ८० जागा मिळायला…

Read More Read More

सहस्र चंद्र दर्शन म्हणजे काय

सहस्र चंद्र दर्शन म्हणजे काय

आपल्याकडं सहस्र चंद्र दर्शन नावाचा एक विधी म्हणा, सोहळा म्हणा, आहे. माणूस ऐंशी वर्ष जगतो म्हणजे तो एक हजार चंद्र पहातो. हिंदू परंपरेनुसार सहस्र चंद्र दर्शन विधी केला की त्या माणसाला मरेपर्यंत बळ प्राप्त होतं, त्याच्यातला अहं कमी होतो. येवढंच नव्हे तर पुढला जन्म घेताना त्या व्यक्तीला आईच्या गर्भातच बळ प्राप्त होऊन पुढला जन्मही ती व्यक्ती बळवान होते. आज भारतातल्या माणसाचं सरासरी जीवनमान ७२ वर्षाचं झालं आहे. माणसं ८० वर्ष अगदी सहजपणे जगतात.  शंभर वर्षापूर्वी सरासरी जीवनमान ५० च्या आतच…

Read More Read More

मलाला आणि कैलास सत्यार्थी

मलाला आणि कैलास सत्यार्थी

कैलास सत्यार्थी आणि मलाला युसुफझाई या दोघाना शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालंय.  कैलास ‘बचपन बचाव’ आंदोलनाचे निर्माते आहेत. मुलांना शिक्षण मिळालं तर त्यांचा विकास होईल. गरीब घरातली माणसं मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतात तेव्हां ती गरीबी वाढवत असतात. मुलाला शिक्षण मिळालं तर पुढं त्यांचा चांगला विकास होतो, गरीबी नष्ट होते असं ते म्हणतात. दोन प्रकारची कामं ते करतात. एक म्हणजे जिथं जिथं मुलांना कामावर ठेवून, बेकायदेशीर रीत्या त्यांच्याकडून कामं करवून घेतात त्या संस्थांवर छापा मारतात. त्या संस्थांना शिक्षा करतात, मुलांना सोडवतात, त्याना…

Read More Read More

लातूरचे जयंत वैद्य गुरुजी गेले

लातूरचे जयंत वैद्य गुरुजी गेले

लातूरचे जयंत वैद्य, वैद्य गुरुजी, गेले. सुरवातीला काही दिवस त्यांचं शरीर त्यांना साथ देईनासं झालं. नंतर त्यांचं मन आणि मेंदूही त्यांना मदत करेनासे झाले होते. वैद्य गुरूजी मुळातले लातूरचे नव्हेत. स्वातंत्र्य सेनानी बाबासाहेब परांजपे यांच्या आग्रहाखातर ते लातूरच्या पॉलिटेक्निकमधे शिकवण्यासाठी रुजू झाले. काही काळ शिकवलं खरं पण नंतर त्यांनी स्वतःचा मोटार रिवाईंडिंचा व्यवसाय सुरु केला. खरं म्हणजे शिकवणं आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी त्यांच्या रक्तात नव्हत्या. अभ्यासाअंती त्यांचे काही सामाजिक, राजकीय इत्यादी विचार तयार झाले होते. एक तरफी. त्या विचारांवर ते…

Read More Read More

मोदींची स्वच्छता मोहिम

मोदींची स्वच्छता मोहिम

नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता मोहिमेची बरीचशी सुलट आणि काहीशी सुलट चर्चा झाली. ते स्वाभाविक होतं. ते सहाच महिन्यांपूर्वी पूर्णबहुमत एकट्याच्या बळावर मिळवलेल्या एका लोकप्रिय पंतप्रधानानं केलेलं आवाहन होतं. भाजपी मोदी समर्थकांचा पाठिंबा होताच. भाजपी नसतांना इतर कारणांसाठी मोदींना पाठिंबा दिलेल्या लोकांचाही पाठिंबा मिळाला कारण गांधीजींच्या नावानं, गांधीजींचा चष्मा हे एक जाहिराती चिन्ह वापरून आवाहन केलेलं होतं. एकादा माणूस चांगली गोष्ट सांगतोय तर त्याला पाठिंबा कां देऊ नये असंही लोकांचं मत होतं.    अशी आवाहनं केली जातात, विसरली जातात.  ही भारताची…

Read More Read More

हाँगकाँगचं लोकशाही आंदोलन

हाँगकाँगचं लोकशाही आंदोलन

गेले काही दिवस हाँगकाँगमधले लाखभर लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी सविनय कायदेभंगाची वाट अनुसरली आहे. आपल्या मागण्या छत्रीवर लिहून ते   निदर्शनं करत आहेत. चीन सरकार अश्रूधूर सोडून, लाठीमार करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे. हाँगकाँगमधल्या ७२ लाख लोकांना मतदानाचा हक्क हवा आहे. हाँगकाँगचा राज्यकर्ता खुल्या निवडणुकीतून निवडण्याचा अधिकार त्यांना हवा आहे. आज घडीला हाँगकाँगचा मुख्य प्रशासक एक १२०० लोकांचं प्रतिनिधी मंडळ निवडतं. हे प्रतिनिधी मंडळ, इलेक्टोरल कॉलेज, चिनी कम्युनिष्ट पक्षानं नेमलेल्या लोकांचं बनलेलं असतं. चीनमधल्या राजकारणात, उद्योग धंध्यात रमलेली…

Read More Read More