Browsed by
Month: July 2015

याकूबची फाशी. एक गोंधळ.

याकूबची फाशी. एक गोंधळ.

याकूब मेमनची फाशी पार पडली. त्याच्या शरीराचं दफन पार पडलं. ३० जुलैच्या सकाळी सात वाजायच्या आत  फाशी व्हायची होती आणि ३० जुलैच्याच पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सर्वोच्च न्यायालय शिक्षेच्या कायदेशीर प्रोसिजरची चर्चा करत होतं. खटल्याची सुनावणी नीट झाली नाही, शिक्षा झाल्याचं आरोपीला आधी कळवलं नाही या मुद्द्यावर फाशी पुढं जाऊ शकत होती. तिकडं नागपूरच्ला तुरुंगाधिकारी  फाशीचा दोर ठीकठाक आहे ना याची शहानिशा करत होते, याकुबला पहाटे उठवायची तयारी करत होते, सर्वोच्च न्यायालयातल्या निकालाची वाट पहात जागत होते.  सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फॅक्सनं…

Read More Read More

काश्मिर प्रश्न समजायला मदत करणारं दुलाट यांचं पुस्तक

काश्मिर प्रश्न समजायला मदत करणारं दुलाट यांचं पुस्तक

अमरजित सिंग दुलाट यांचं काश्मिर, दी वाजपेयी इयर्स हे पुस्तक प्रसिद्ध झालंय. अनेक गोष्टी त्या पुस्तकात आहेत. नेते आणि दहशतवादी यांची व्यक्तिचित्रं त्यात आहेत. काश्मिरी माणसाचा एक्सरे त्यात आहे. काश्मिर प्रश्नाची गुंतागुंत आणि त्यावरचे संभाव्य उपायही या पुस्तकात आहेत. काश्मिरी लोकांना ना पाकिस्तानात जायचय ना हिंदुस्तानात. त्यांना स्वतंत्र रहायचं आहे. पाकिस्तान आणि भारत या दोघांनाही पाकिस्तान त्यांच्यात हवंय. पाकिस्तानला अर्ध काश्मिर मिळालंय, उरलेलं अर्ध त्यांना बळकावायचंय. आपल्यात असलेलं काश्मिर आपल्यातच रहावं इतपत भारताची इच्छा आहे. नरसिंह राव यांनी जाहीर केलं…

Read More Read More

व्यापम. भुसभुशीत जमीन. त्यावर इमले बांधणारे भुसभुशीत इंजिनियर.

व्यापम. भुसभुशीत जमीन. त्यावर इमले बांधणारे भुसभुशीत इंजिनियर.

मध्य प्रदेशात चाळीसेक माणसांचे मृत्यू माध्यमांनी व्यापम घोटाळ्याशी जोडले आहेत. कोणाचा हृदय विकारानं मृत्यू झालाय, कोणी दारूचा डोस जास्त झाला म्हणून मेलंय, कोणी आत्महत्या केलीय. मध्य प्रदेश सरकारचे गृहमंत्री बाबुलाल गौर यांची यातल्या काही मृत्यूंबद्दलची प्रतिक्रिया अशी- ‘ माणसं मरतच असतात. माणसाला हार्ट अटॅक येत असतो. जगण्यातल्या तणावामुळं माणसं आत्महत्या करत असतात. नेहमीच अशा गोष्टी घडत असतात. ‘ मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान म्हणाले ‘ झालेले मृत्यू दुःखद आहेत पण ते व्यापम घोटाळ्याशी जोडणं योग्य नाही.’ दोन मृत्यूंचे तपशील असे. ८ जानेवारी…

Read More Read More

ग्रीस, चीन, भारतही?

ग्रीस, चीन, भारतही?

ग्रीसवर ३५० अब्ज युरोचं कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी ग्रीसला आणखी कर्ज घेणं भाग आहे. मागं असंच घडलं होतं. सुरवातीला ११० अब्जाचं कर्ज घेतलं. ते फेडण्यासाठी आणखी २४० अब्जाचं कर्ज घेतलं. आणि आता ते फेडण्यासाठी पुन्हा कर्ज हवंय. ऋणको सांगताहेत की खर्च कमी करा, काटकसर करा, त्रास सहन करा. कर वाढवा, खाजगीकरण करा, सार्वजनिक क्षेत्रावरचा खर्च कमी करा. त्या अटी ग्रीकांना अमान्य दिसताहेत. कर्ज घेतल्यावाचून गत्यंतर नाहीये. तेव्हां नवे दाते शोधण्याच्या खटपटीत ग्रीक सरकार आहे. दाते मंडळींकडून घातल्या जाणाऱ्या अटी…

Read More Read More

व्यापम घोटाळा

व्यापम घोटाळा

२०१४ च्या कालनिर्णय दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख. लेखात टू जी आणि व्यापम या दोन घोटाळ्यांचा धांडोळा होता. पैकी व्यापम प्रकरण पुन्हा गाजू लागल्यानं त्या लेखातला व्यापमसंबंधी भाग इथं पुन्हा. ।। मिहीर कुमार हा तरूण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक के सुदर्शन यांच्याकडं काम करत असे. सेवादार होता. त्याची अन्न निरीक्षक, फूड इन्सपेक्टर या पदावर मध्य प्रदेश सरकारच्या खात्यात काम करायची इच्छा होती. त्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते. ही २००७ सालातली हकीकत. मिहीरनं परीक्षेबाबत चौकशी केली, केव्हां, कुठं, विषय कोणते वगैरे. …

Read More Read More

वसुंधरा राजे, सुषमा स्वराज, छगन भुजबळ.

वसुंधरा राजे, सुषमा स्वराज, छगन भुजबळ.

ललित मोदी प्रकरण थंडावलंय. माध्यमांच्या खोदकामातून आता नवं काही बाहेर निघत नाहीये.  प्रकरण असं. ललित मोदी नावाचा एक माणूस. समाजातल्या तालेवार घराण्यांशी संबंध असलेल्या घराण्यात जन्मला. वसुंधरा राजे या राजघराण्याशी मोदी घराण्याचे कौटुंबिक संबंध. त्यामुळं मोदी राजे घराण्यातल्या वातावरणात, त्या निमित्तानं राजस्थान सरकारात लीलया वावरत असे, घरचं असल्यागत. खेळा भोवती त्यानं आपलं जाळं गुंफलं. राजस्थान क्रिकेटचा वापर करून तो देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे घुसला. मॅचेस खेळवणं, स्टेडियम इत्यादी व्यवस्था ताब्यात घेऊन त्यांचा वापर करणं यामधे त्यानं करियर केलं. सुरवातीला राजस्थानात,…

Read More Read More

माणसाचा छळ करणाऱ्या प्रथा बंद व्हाव्यात

माणसाचा छळ करणाऱ्या प्रथा बंद व्हाव्यात

गणेशोत्सवाचे वेध लागलेत. मुंबई ऊच्च न्यायालयानं निकाल दिलाय की मुंबईच्या रस्त्यावर खड्डे खणून मंडप बांधण्याला सरकारनं प्रतिबंध करावा. कानठळ्या बसवणारं संगित आणि विविध आवाजही रस्त्यावर असू नयेत असं न्यायालयानं आधीच सांगितलं आहे. न्यायालयाचं हे म्हणणं केवळ गणेशोत्सवालाच नाही तर कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला लागू असेल. सर्व धर्मांचे सण त्यात आलेच पण लग्नं, बारशी, वाढदिवस इत्यादिही त्यात आले. शाळा कॉलेजांत होणारे विविध कार्यक्रमही त्यात आले.  नागरिकांना होणारा त्रास वाचवणं हा प्रमुख उद्देश. एका मर्यादेपलिकडचा आवाज माणसाचं आयुष्य कमी करतो हे सिद्ध झालेलं…

Read More Read More