केजरीवाल
केजरीवाल सतत म्हणतात
की त्यांना आंदोलनं करायची, निवडून यायची हौस नाही. भ्रष्टाचार होतोय, अगदी
दैनंदिन गरजाही नागरिकांना भागवता येत नाहीत म्हणून त्यांना हे उद्योग करावे
लागतायत. राजकीय व्यवहार आणि व्यवस्था यात
सुधारणा झाल्यास आपल्याला कामच उरणार नाही असं केजरीवाल म्हणतात. लोकांनी भ्रष्ट
लोकांना संसदेपासून दूर ठेवल्यानंतर आप पार्टीची जरूरच शिल्लक रहाणार नाही, ती पार्टी बरखास्त करता
येईल आणि केजरीवालही आपल्या इतर कामाला लागतील.
एक राजकीय पक्ष काढायचा, वाढवायचा,चालवायचा यात त्यांना रस नाही. त्यांना सरकारात रस नाहीये,
जे कोणतं सरकार तयार होईल ते लोकाभिमुख, पारदर्शक आणि स्वच्छ कामं करेल
याची खटपट आप पार्टीला करायची आहे.(केंद्रात समजा आप पार्टीला बहुमत मिळालं तर? तर मात्र त्यांचा वांधा आहे. केंद्रातलं सरकार चालवण्याची पूर्वतयारी आणि
क्षमता त्यांच्याकडं नाहीये. )
की त्यांना आंदोलनं करायची, निवडून यायची हौस नाही. भ्रष्टाचार होतोय, अगदी
दैनंदिन गरजाही नागरिकांना भागवता येत नाहीत म्हणून त्यांना हे उद्योग करावे
लागतायत. राजकीय व्यवहार आणि व्यवस्था यात
सुधारणा झाल्यास आपल्याला कामच उरणार नाही असं केजरीवाल म्हणतात. लोकांनी भ्रष्ट
लोकांना संसदेपासून दूर ठेवल्यानंतर आप पार्टीची जरूरच शिल्लक रहाणार नाही, ती पार्टी बरखास्त करता
येईल आणि केजरीवालही आपल्या इतर कामाला लागतील.
एक राजकीय पक्ष काढायचा, वाढवायचा,चालवायचा यात त्यांना रस नाही. त्यांना सरकारात रस नाहीये,
जे कोणतं सरकार तयार होईल ते लोकाभिमुख, पारदर्शक आणि स्वच्छ कामं करेल
याची खटपट आप पार्टीला करायची आहे.(केंद्रात समजा आप पार्टीला बहुमत मिळालं तर? तर मात्र त्यांचा वांधा आहे. केंद्रातलं सरकार चालवण्याची पूर्वतयारी आणि
क्षमता त्यांच्याकडं नाहीये. )
केजरीवाल यांनी निर्माण केलेली परिस्थिती हे
प्रस्थापित राजकीय पक्षांना एक आव्हान आहे. सुधारा असं केजरीवाल सांगत आहेत. सुधारणेची निकड ते
दाखवत आहेत. एक नवा पक्ष काढून विकसित करण्याचं केजरीवालांच्या मनात नाही. राजकीय
पक्षांनी सुधारणा करावी असं त्यांच्या मनात आहे. राहूल, मोदी, पवार, राजा, कलमाडी,कणीमोळी,
मुलायम, मायावती असल्या लोकांना उभं करू नका, वेगळ्या चांगल्या लोकांना उभं करा
असं ते राजकीय पक्षांना सांगत आहेत.
प्रस्थापित राजकीय पक्षांना एक आव्हान आहे. सुधारा असं केजरीवाल सांगत आहेत. सुधारणेची निकड ते
दाखवत आहेत. एक नवा पक्ष काढून विकसित करण्याचं केजरीवालांच्या मनात नाही. राजकीय
पक्षांनी सुधारणा करावी असं त्यांच्या मनात आहे. राहूल, मोदी, पवार, राजा, कलमाडी,कणीमोळी,
मुलायम, मायावती असल्या लोकांना उभं करू नका, वेगळ्या चांगल्या लोकांना उभं करा
असं ते राजकीय पक्षांना सांगत आहेत.
केजरीवालांकडं पाहू
नका, ते ज्या राजकीय पक्ष आणि व्यवस्थेबद्दल बोलतायत त्याकडं पहा.
नका, ते ज्या राजकीय पक्ष आणि व्यवस्थेबद्दल बोलतायत त्याकडं पहा.
अस्तित्वात असलेल्या
मोठ्या डझनोगणती पक्षांत आणखी एकाची भर घालण्याऐवजी आहेत तेच पक्ष अधिक लोकाभिमुख
करणं ही एक शहाणपणाचीच गोष्ट आहे.
मोठ्या डझनोगणती पक्षांत आणखी एकाची भर घालण्याऐवजी आहेत तेच पक्ष अधिक लोकाभिमुख
करणं ही एक शहाणपणाचीच गोष्ट आहे.
ज्यांचे हात बरबटलेले
नाहीत, ज्यांचं डोकं सामान्यपणे ठिकाणावर आहे, जे कायद्यानं वागतात अशा माणसांना
मत देणं. राजकीय पक्षांनी तशी माणसं उभी केली तर छानच. न केली तर उभ्या असलेल्या
तशा आप पार्टीच्या उमेदवाराना मतं देणं.
नाहीत, ज्यांचं डोकं सामान्यपणे ठिकाणावर आहे, जे कायद्यानं वागतात अशा माणसांना
मत देणं. राजकीय पक्षांनी तशी माणसं उभी केली तर छानच. न केली तर उभ्या असलेल्या
तशा आप पार्टीच्या उमेदवाराना मतं देणं.
एक मजेशीर घटना
पुण्यात घडत असल्याचं कानावर येतंय. काँग्रेस पक्ष उमेदवार निवडतोय. दोन जमीन
बळकावणारे, बिल्डर असे इच्छुक समोर आल्यावर
झुरळ झटकावं तसं त्यांना दूर केलं गेलं. प्रत्यक्षात खरंच एकादा बरा माणूस
ते उभा करतील की नाही ते सांगता येत नाही. परंतू आप पार्टी आणि त्यांना मत द्यायला
निघालेले नागरीक यांच्या धाकानं काँग्रेस हा भ्रष्टाचारात बरबटलेला पक्ष चांगल्या
माणसांचा विचार करू लागला हेही किती छान.
पुण्यात घडत असल्याचं कानावर येतंय. काँग्रेस पक्ष उमेदवार निवडतोय. दोन जमीन
बळकावणारे, बिल्डर असे इच्छुक समोर आल्यावर
झुरळ झटकावं तसं त्यांना दूर केलं गेलं. प्रत्यक्षात खरंच एकादा बरा माणूस
ते उभा करतील की नाही ते सांगता येत नाही. परंतू आप पार्टी आणि त्यांना मत द्यायला
निघालेले नागरीक यांच्या धाकानं काँग्रेस हा भ्रष्टाचारात बरबटलेला पक्ष चांगल्या
माणसांचा विचार करू लागला हेही किती छान.
असं
पूर्वी घडलेलं नाही.
पूर्वी घडलेलं नाही.