केजरीवाल आता खोल
पाण्यात उतरत आहेत. आता ते गंभीर राजकीय, आर्थिक भूमिकांकडं सरकत आहेत. आतापर्यंत
ते भ्रष्टाचार या एका परीनं सर्वाना मान्य असणाऱ्या गोष्टीबद्दल बोलत होते. वीज,
पाणी, शिक्षण या गोष्टी सर्वांना मिळाल्या पाहिजेत हे त्यांचं मत तसं पाहिलं तर
सर्व पक्ष आणि जनतेला मान्य आहे. पण 
शिक्षण,आरोग्य, वीज, पाणी मिळायचं तर त्यासाठी एकादा आर्थिक-राजकीय विचार
हवा. तो कोणता असेल यावर ते बोलत नव्हते. आता ते बोलले आहेत. इथून पुढं त्यांची
आणि जनतेची खरी कसोटी सुरू होते.
केजरीवाल म्हणाले की
ते भांडवलशाहीच्या विरोधात नाहीत, ते क्रॉनी भांडवलशहांच्या विरोधात आहेत. दुसरं
म्हणजे सरकारनं बिझनेसमधे ढवळाढवळ करू नये, सरकारनं बिझनेसचं नियंत्रण करावं असंही
ते म्हणाले. ही दोन्ही वक्तव्यं गंभीर, विचार करायला लावणारी आहेत.
माझ्या कल्पनेप्रमाणं
देशातल्या कोणाही राजकीय पक्षाला तशी भूमिका जाहीरपणे घ्यायची नाहीये. डाव्यांना
सरकारची सर्व गोष्टीत ढवळाढवळ हवीय. भाजप या उजव्या पक्षालाही सरकारकेंद्री
अर्थव्यवस्था हवी आहे. कारण सामान्यतः भारतीय माणूस हा पैसे मिळवणं, उद्योग,
भांडवलशहा इत्यादी गोष्टींकडं वाईट म्हणून पहातो. भरपूर पैसे मिळवणारा या देशात
धनदांडगा होतो. सुखात रहाणाऱ्या माणसाला या देशात चंगळवादी असं म्हणतात. हे जे
समाजाचं मानस भारतात तयार झालं आहे ते चुकीचं आहे हे समजत असूनही देशातले पक्ष ते
सुधारण्याला  तयार नाहीत. कारण त्या  विषयाला हात घातला रे घातला की गरीब, निम्न
मध्यमवर्गीय इत्यादी मिळून तयार होणारी मतांची बँक बिथरते. मध्यम वर्गीयालाही
सरकारच्या मागं लपून अकार्यक्षमरीत्या चालणाऱ्या अर्थव्यस्थेचे फायदे घ्यायचे
असतात.
एक अत्यंत कठीण, जुनी
अशी ही गोची आहे. या झोलाला अजून कोणी हात घातलेला नाही.

केजरीवाल ते धाडस करत
आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *