बबन घोलप यांना शिक्षा झाली कारण त्यांच्या विरोधात पुरावे होते.
अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनानं माहिती अधिकाराचा वापर करून पुरावे गोळा
केले होते. 98-99 मधे अण्णा आणि खैरनार म्हणाले होते की आपण ट्रकभरून पुरावे सादर
करायला तयार आहोत. शरद पवार इत्यादींनी अण्णांची टिंगल केली होती, एक  तरी पुरावा आणून दाखवा असं म्हणाले होते.
अण्णांकडं ट्रकभर पुरावे होते हे मी स्वतः पाहिलेलं आहे. त्या वेळी मी अण्णांच्या
आंदोलनाचा अभ्यास करत होतो, अण्णांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटत होतो. राळेगण
सिद्दीत झालेल्या एका बैठकीला तीस चाळीस कार्यकर्ते आले होते त्यांच्याकडं पोती
भरतील येवढे कागद होते. असे पुरावे गोळा करण्यात आघाडीवर होते जळगावचे हेमचंद्र
काळे. त्यांच्या घरात पुराव्यांच्या फायलींचा ढीग होता. त्यांची पत्नी रागवायची
कारण त्यांना घरात ना बसायला जागा ना वस्तू ठेवायला. काळे यांनी जळगावच्या
पुढाऱ्यांना अडचणीत आणलं होतं. त्या बदल्यात काळे यांना मारहाणीचे प्रयत्न
झाले,त्यांच्या घरावर रात्री दगडफेक होत असे. पत्नी व मुलगा काही काळ घाबरून गावी
रहायला गेले होते. परंतू यत्किंचितही न घाबरलेले काळे शांतपणे आपलं काम करत होते.
अण्णांचे दुसरे सहकारी नगरचे अशोक सब्बन. त्यांनीही हाल सोसत भ्रष्टाचारविरोधी लढा
तेवत ठेवला. आजही ही माणसं कशाचीही अपेक्षा न बाळगता लढत आहेत. अण्णांच्या सोबत आहेत ते अशोक सब्बन आणि फायली चाळत आहेत ते काळे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *