बबन घोलप यांना तीन वर्षांची
सक्त मजुरी झाली. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर 15 वर्षांनी. एक कोटीपेक्षा जास्त
संपत्तीचा हिशोब त्याना देता आला नाही. कोर्टानं मात्र पती पत्नीना मिळून दोन
लाखांचा दंड केला आहे. खरं म्हणजे किमान 50 लाख दंड करायला हवा आणि दंडाची रक्कम
त्यांची संपत्ती जप्त करून गोळा करायला हवी.
     अण्णा हजारे आणि यावतकर अशा
दोघांनी प्रकरण धसाला  लावलं. त्यावेळी
त्यावेळच्या भाजप-सेना या सत्ताधारींनी अण्णाना नावं ठेवली. घोलप यांनी बदनामीचा
खटला भरून अण्णांना तुरुंगात पाठवलं. शेवटी इतक्या वर्षांनी कां होईना अण्णांचं
म्हणणं खरं ठरलं.
सेना-भाजप  यांच्या भ्रष्टाचाराचा
निदान एक तरी पुरावा सिद्ध झाला.
अण्णांनी शरद पवारांना पत्र लिहिलय. पवारांचे नातेवाईक पद्मसिंग पाटील
यांच्यावर भ्रष्टाचार  आणि गंभीर गुन्ह्यांचे
आरोप असतांनाही पवार पाटलांना तिकीट देतात या बद्दल दुःख व्यक्त केलंय.
बहुदा आणखी पंधरा वर्षांनी पाटील हे गुन्हेगार होते आणि भ्रष्ट होते असं
सिद्ध होईल.
      हजारे आणि खैरनार यांनी 98-99 मधे
भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरु केलं तेव्हां पवारांसह सर्व पुढाऱ्यांनी त्यांची
टिगल केली होती.
     घोलप, शिवणकर, सुतार,
पद्मसिंग यांचे गुन्हे अण्णा व त्यांची मेहनती आणि निर्भय फौज यांनी नेटानं शोधले.
     हे काम खरं म्हणजे
माध्यमांचं. माध्यमं ते करत नाहीत. कां? ते माध्यमं आळशी
झालीत, पत्रकारी कसब आणि कर्तव्य शिल्लक नाहीये आणि ती पक्षपाती झालीत.
     खरं म्हणजे घोलपादी चोरांना
शिक्षा करण्याचं काम सरकारचं, राजकीय पक्षांचं, किमानपक्षी  विरोधी पक्षांचं. त्यांनी ते केलं नाही.का.?

     राजकीय पक्ष गंभीर नाहीत,
कार्यक्षम नाहीत, चोरीव्याप्त आहेत आणि भ्रष्ट आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *