शरद जोशी. निःसंग अर्थवादी माणूस
शरद जोशी यांनी त्यांच्या स्थावर जंगम मालमत्तेची विल्हेवाट लावली.
जाहीरपणे.
सगळं लिहून ठेवलं होतं.
पारदर्शक.
कोणालाही पहाता यावं अशा रीतीनं.
जाहीरपणे.
सगळं लिहून ठेवलं होतं.
पारदर्शक.
कोणालाही पहाता यावं अशा रीतीनं.
रहातं घर आपल्या दोन मुलींना दिलं.
साताठ एकर जमीन होती.
ती शेतकरी संघटनेला दिली.
ती शेतकरी संघटनेला दिली.
साठ सत्तर लाख रुपये होते.
ते त्यांच्यासोबत सावलीसारखे राहिलेल्या सचीव, व्यक्तीगत सेवा करणारा माणूस आणि ड्रायव्हर यांना दिले.
ते त्यांच्यासोबत सावलीसारखे राहिलेल्या सचीव, व्यक्तीगत सेवा करणारा माणूस आणि ड्रायव्हर यांना दिले.
आयुष्यभरात जमा केलेली सगळी संपत्ती फार तर दीडेक कोटीची.
वाटणीची ही बातमी प्रसिद्ध झाली त्याच दिवशी,
याच बातमीपाठोपाठ महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुकीचीही बातमी प्रसिद्ध झाली.
या निवडणुकीतल्या उमेदवारांची संपत्ती ८७ कोटी,
६० कोटी,
४० कोटी,
२७ कोटी इत्यादी होती.
याच बातमीपाठोपाठ महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुकीचीही बातमी प्रसिद्ध झाली.
या निवडणुकीतल्या उमेदवारांची संपत्ती ८७ कोटी,
६० कोटी,
४० कोटी,
२७ कोटी इत्यादी होती.
१९७६ च्या सुमारास नोकरी सोडून जोशी आंदोलनात उतरले.
नोकरी सोडताना त्याना पेन्शन आणि इतर फायदे मिळून जे काही पैसे होते त्यावर ते नंतरचा काळ जगले.
काही काळ ते लोकसभेत होते.
त्यावेळी त्याना काही वेतन मिळालं आणि थोडंसं पेन्शन मिळालं.
येवढ्यावरच त्यांच्याकडं वर वर्णन केलेली संपत्ती गोळा झाली.
गोळा झालेला पैसा आणि घरदार वगैरे यांचा काळ साधारणपणे १९७५ ते १९९०.
जुनं घर,
त्या काळातली स्वस्त जमीन आणि जमा झालेले पैसे,
आज घडीला पैशाच्या कमी झालेल्या किमतीत वरील सर्व संपत्तीची किमत कोटी दीड कोटी रुपये होते.
नोकरी सोडताना त्याना पेन्शन आणि इतर फायदे मिळून जे काही पैसे होते त्यावर ते नंतरचा काळ जगले.
काही काळ ते लोकसभेत होते.
त्यावेळी त्याना काही वेतन मिळालं आणि थोडंसं पेन्शन मिळालं.
येवढ्यावरच त्यांच्याकडं वर वर्णन केलेली संपत्ती गोळा झाली.
गोळा झालेला पैसा आणि घरदार वगैरे यांचा काळ साधारणपणे १९७५ ते १९९०.
जुनं घर,
त्या काळातली स्वस्त जमीन आणि जमा झालेले पैसे,
आज घडीला पैशाच्या कमी झालेल्या किमतीत वरील सर्व संपत्तीची किमत कोटी दीड कोटी रुपये होते.
सारा देश हादरवून टाकलेल्या, दहाएक वर्ष देशातल्या राजकीय पक्षांना सळो की पळो करून सोडणाऱ्या, ज्याला विकत घ्यायला देशातली राजकीय आणि आर्थिक सत्ता आतूर होती अशा माणसानं जमा केलेली ही मालमत्ता.
वयाची ८१ वर्षं पार करेपर्यंत.
वयाची ८१ वर्षं पार करेपर्यंत.
शेवटल्या काही दिवसांत पुण्यामधे त्यांच्या सहकाऱ्यांनी एक कार्यशाळा भरवली होती.शेतकरी आणि देशाची एकूण अर्थव्यवस्था या विषयावर.
या कार्यशाळेत जोशी तास दोन तास बसले होते.
त्याना नीट ऐकू येत नव्हतं.
गाडीतून उतरणं,
चालत हॉलपर्यंत पोचणं,
खुर्चीत बसणं,
अस्वस्थ वाटू लागल्यावर कासवाच्या गतीनं कष्टानं हॉलबाहेर पडणं.
सारं ते सहन करत होते,
त्यांच्या सहकाऱ्यानाच ते पहावत नव्हतं.
या कार्यशाळेत जोशी तास दोन तास बसले होते.
त्याना नीट ऐकू येत नव्हतं.
गाडीतून उतरणं,
चालत हॉलपर्यंत पोचणं,
खुर्चीत बसणं,
अस्वस्थ वाटू लागल्यावर कासवाच्या गतीनं कष्टानं हॉलबाहेर पडणं.
सारं ते सहन करत होते,
त्यांच्या सहकाऱ्यानाच ते पहावत नव्हतं.
शरद जोशी अर्थवादी होते.
मुक्त बाजार आणि मुक्त अर्थव्यवस्थेवर त्यांचा विश्वास होता. माणसाला त्याच्या इच्छेनुसार, स्वतःच्या मेहनतीवर अर्थार्जन करण्याचा आणि उपभोग घेण्याचा अधिकार मूलभूत आहे असं ते मानत असत.
मुक्त बाजार आणि मुक्त अर्थव्यवस्थेवर त्यांचा विश्वास होता. माणसाला त्याच्या इच्छेनुसार, स्वतःच्या मेहनतीवर अर्थार्जन करण्याचा आणि उपभोग घेण्याचा अधिकार मूलभूत आहे असं ते मानत असत.
निखळ अर्थवादी माणूस कसा जगू शकतो याचं एक उदाहरण.
।।
One thought on “शरद जोशी. निःसंग अर्थवादी माणूस”
एखाद्या मंत्र्याने, खासदाराने, आमदाराने किंवा एखाद्या नगरसेवकाने असं मृत्युपत्र केल्याचं एखादे तरी उदाहरण आठवतंय कुणाला? (एक ग प्र प्रधान सोडले तर!)