Browsed by
Author: niludamle

गटारावरचं झाकण निघालं, दुर्गंधी व विषार हे वास्तव कळलं.

गटारावरचं झाकण निघालं, दुर्गंधी व विषार हे वास्तव कळलं.

जे झालं ते बरंच झालं. पोलिस हे प्रकरण काय आहे ते कळलं तरी. सीबीआयचे उपसंचालक देवेंद्र कुमार अटकेत आहेत. लाचबाजीचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयचे संचालक राकेश अस्थाना यांच्यावर लाचबाजीचा आरोप असून त्यांची चौकशी चाललीय. त्यांनाही अटक होऊ शकते. सीबीआयचे विद्यमान संचालक आलोक वर्मा यांच्यावर अस्थाना यांनी लाचबाजीचा आरोप केला आहे. वर्मा आणि अस्थाना या दोघांनाही कामावरून दूर करून त्यांच्या जागी नागेश्वर राव या संचालकांची नेमणूक झाली. त्यांच्या विरोधातही सीबीआयमधे भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत. थोडासा तपशील कळावा म्हणून राकेश अस्थाना यांचं उदाहरण…

Read More Read More

२०१८ नोबेल अर्थशास्त्र बक्षीस. पारंपरीक लेबलं उचकटली.

२०१८ नोबेल अर्थशास्त्र बक्षीस. पारंपरीक लेबलं उचकटली.

आर्थिक विकास आणि ज्ञान निर्मिती; पर्यावरण प्रदुषण आणि आर्थिक धोरण; या दोन एकमेकांशी संबंधित नसलेल्या पण महत्वाच्या विषयावर स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या दोन अर्थशास्त्रींना २०१८ सालचं नोबेल पारितोषिक मिळालंय. पॉल रोमर यांनी १९८६ आणि १९९० मधे प्रकाशित केलेल्या प्रबंधांचा विचार नोबेल समितीनं केला. प्रबंधांत त्यांनी ज्ञान निर्मिती आणि आर्थिक विकास यातील संबंधांचं विवेचन केलं आहे. रोमर हार्वर्डमधे प्रोफेसर होते आणि सध्या न्यू यॉर्क विश्वशाळेत संशोधन करतात. काही काळ ते विश्व बँकेचे आर्थिक सल्लागारही होते. विल्यम नॉर्डहॉस येल विश्वशाळेत अर्थशास्त्र शिकवतात. १९७०…

Read More Read More

२२ जुलै. हलवून टाकणारा, कालवाकालव करणारा चित्रपट

२२ जुलै. हलवून टाकणारा, कालवाकालव करणारा चित्रपट

२२ जुलै. नेटफ्लिक्सवर १० ऑक्टोबरला प्रकाशित झालेली २२ जुलै पहात असताना मनात येतं की यंदाच्या ऑस्करमधे या फिल्मचा नंबर लागू शकेल. नॉर्वेमधे दहशताद्यानं एक इमारत उडवली आणि एका बेटावर शिबिरासाठी जमलेल्या ६९ मुलांना ठार मारलं असा विषय चित्रपटाच्या केंद्रात आहे. विषयामधे प्रचंड नाट्य आहे, थरार आहे आणि त्याला प्रचंड दृश्य मूल्य आहे. थरार आणि नाट्य हे दोन घटक चित्रपट मर्यादेत ठेवतो आणि माणसं, माणसांतले संबंध, माणसातल्या विकृती, माणाची लढाऊ वृत्ती, माणसाचं शहाणपण आणि मूर्खपणा इत्यादी पैलू दाखवतो. दोन चित्रपटांची आठवण…

Read More Read More

मोदी शहा पक्षाचं हमी भावाचं नाटक

मोदी शहा पक्षाचं हमी भावाचं नाटक

२ ऑक्टोबर रोजी सुमारे तीसेक हजार शेतकरी आपलं रडगाऱ्हाणं घेऊन दिल्लीत गेले. पोलिसांनी त्यांच्यावर पाणी आणि लाठ्यांचा मारा केला. अनेक जुन्या जखमांत आणखी एका जखमेची भर घालून शेतकरी शेतोशेती परतले. ४ ऑक्टोबर रोजी मोदीशहा सरकारनं गहू, नाचणी ही धान्यं; मसूर, चणा या डाळी, मोहोरी या पिकांच्या रब्बीच्या हमी भावात वाढ जाहीर केली. नोव्हेंबर महिन्यातच राजस्थान आणि मध्य प्रदेश या मोदीशहा पक्षाच्या राज्यात निवडणुका आहेत. तिथं जनतेमधे चलबिचल आहे, जनता मोदीशहा सरकारं पाडण्याच्या बेतात आहे अशा बातम्या आहेत. वरील पिकं वरील…

Read More Read More

ट्रंपना उघडं करणारं बॉब वुडवर्ड यांचं पुस्तक

ट्रंपना उघडं करणारं बॉब वुडवर्ड यांचं पुस्तक

ट्रंपना उघडं करणारं बॉब वुडवर्ड यांचं पुस्तक वॉटरगेट प्रकरण शोधून काढणाऱ्या बॉब वुडवर्ड यांचं ट्रंपांचे व्हाईट हाऊसमधले दिवस या विषयावरचं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं. ट्रंप कसे निर्णय घेतात, त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे यावर हे पुस्तक प्रकाशझोत टाकतं. ।। पुस्तकाच्या सुरवातीच्या पानावर बॉब वुडवर्डनी डोनल्ड ट्रंप यांचा एक वाक्यं अवतरलं आहे. Real power is ….fear. बळाचा वापर करून, धादांत खोटं बोलून, अवास्तव आणि प्रमाण नाकारणारी वक्तव्य करून समोरच्या माणसाला घाबरवणं हे ट्रंप यांचं वैशिष्ट्यं प्रस्तुत पुस्तकात पानोपानी प्रत्ययाला येतं. ट्रंपनी निवडणुक…

Read More Read More

समाज म्हणजे निवडक वस्तूंचं म्युझियम किवा आर्ट गॅलरी नव्हे

समाज म्हणजे निवडक वस्तूंचं म्युझियम किवा आर्ट गॅलरी नव्हे

समाज म्हणजे निवडक वस्तूंचं म्युझियम किवा आर्ट गॅलरी नव्हे माणसाची किमत तो किती पैसे मिळवतो यावरूनच करायची का? हा प्रश्न इराणमधून स्थलांतरीत झालेल्या रोया हक्कियन डोनल्ड ट्रंपांच्या अमेरिकेला विचारत आहेत. कारण ट्रंप बाहेरच्या माणसांना देशात घेताना त्यांची पैसे मिळवण्याची क्षमता ही कसोटी लावणार आहेत. वरील प्रश्न त्यांनी “Journey from the Land of No: A Girlhood Caught in Revolutionary Iran” या त्यांच्या ताज्या पुस्तकात उपस्थित केलाय. रोया हक्कियन एक कवयित्री आहेत. रोया १९८५ साली अमेरिकेत स्थलांतरित झाल्या. खोमेनी यांचं धर्मराज्य इराणमधे…

Read More Read More

माणसं बेघर होताहेत

माणसं बेघर होताहेत

न्यू झीलँड सरकारनं बाहेरून येणाऱ्या लोकांना घरं खरेदी करायला बंदी घातलीय. चीन आणि ऑस्ट्रेलियातल्या घरांच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्या मानानं न्यू झीलंडच्या शहरात जमीन आणि घरं स्वस्त असल्यामुळं भरपूर पैसे असलेले चिनी आणि ऑस्ट्रेलियन न्यू झीलँडमधे घरं विकत घेत आहेत. गेल्या १० वर्षात हा कल अधिक तीव्र झालाय. न्यू झीलँडमधे घरांची बाजारपेठ खुली होती, सरकारचं तिच्यावर नियंत्रण नव्हतं. चिनी लोक येत आणि वाट्टेल ती किमत द्यायला तयार होत. घरमालक म्हणे की चांगली किमत मिळत्ये ना, मग झालं तर. त्या…

Read More Read More

आर्थिक निर्णय, पंतप्रधान, नोकरशाही.

आर्थिक निर्णय, पंतप्रधान, नोकरशाही.

नोटबंदीनं भारताची अर्थव्यवस्था एक वर्षानं मागं नेली. काहीही निष्पन्न न झाल्यानं सगळा खटाटोप आतबट्ट्याचा ठरला. नव्या नोटा छापणं. त्या देशभर पोचवणं. जुन्या नोटा बँकेत गोळा करणं व त्यांचा हिशोब ठेवणं. प्रचार,जाहिराती. भारत सरकारची बरीच यंत्रणा याच उद्योगात काही काळ गुंतली होती. सुमारे ३.५ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं.   निर्णय घेण्याचा घटनात्मक अधिकार पंतप्रधानांना आहे. तो त्यांनी वापरला. समजा त्यांनी जुगार केला असं म्हणूया. समजा त्यांनी  अज्ञानापोटी निर्णय घेतला असं म्हणूया. समजा काही तरी चमत्कारीक गोष्ट करून लोकांना भारून टाकायचं असं…

Read More Read More

मोदीशहा पार्टीची अपप्रचार मोहिम

मोदीशहा पार्टीची अपप्रचार मोहिम

मोदी-शहा पार्टीच्या वतीनं निवडणुकीची तयारी सुरू केलीय. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यात अपयश आल्यामुळं  नाना मार्गांनी लोकांना वेडावण्याचे उद्योग मोदी-शहा पार्टीनं सुरु केलेत.   मोदी हा एक थोर माणूस आहे असं लोकांना पटवणं हा त्यातला एक उद्योग.  मोदींवर टीका करणारी माणसं वाईट्ट असतात असं मोदी-शहा पार्टी सतत सांगत असते. कार्यक्रम-मुद्दे यावरच्या चर्चेपासून दूर नेऊन लोकाना भावनांत गुंतवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जनरल कर्णिक यांच्या नावानं एक वक्तव्य मिडियात फिरवलं जातय. त्याचा सारांश असा –  मोदी हे थोर गृहस्थ असून लोक विनाकारण त्यांच्या…

Read More Read More

नाबार्ड शेतकरी सर्वेक्षण, सरकारांची धोरण फसवाफसवी

नाबार्ड शेतकरी सर्वेक्षण, सरकारांची धोरण फसवाफसवी

नाबार्डचं ताजं सर्वेक्षण प्रसिद्द झालंय. त्यात भारतात शेतकरी कुटुंबं किती आहेत आणि त्यांचं महिना उत्पन्न किती आहे याची पाहणी करण्यात आलीय. त्यानुसार भारतात ४८ टक्के कुटुंबं शेतकरी कुटुंबं आहेत आणि ५२ टक्के शेतकरी नसलेली कुटुंबं आहेत.  सरासरी शेतकरी कुटुंबातलं शेतीपासून मिळणारं उत्पन्न ४३ टक्के आहे आणि उरलेलं उत्पन्न शेतीव्यतिरिक्त कामातून मिळतं. म्हणजेच घरातलं कोणीतरी शेतीसोडून इतर काम करतं, शेतमजूरी किंवा कुठली तरी नोकरी. शेतकरी कुटुंबातला माणूस शेतमजुरी करतो याचं कारण भारतातल्या शेतीचा आकार सरासरी २०७१ एकर आहे. या आकाराची सर्वसाधारण…

Read More Read More