नेपाळमधली सुनामी
२६ ऑगस्ट. नेपाळ आणि तिबेटमधे हिमालयी सुनामी झाली. दगडमातीचा दाट द्रव झालेल्या पाण्याचा पूर आला. पुराचा वेग आणि जोर येवढा होता की तिबेटमधली एक पाच मजली इमारतीचा मिनिटभरात चुराडा झाला, इमारतीच्या जागी मातीचा ढीग उरला. नेपाळमधली कित्येक गावं अख्खीच्या अख्खी वाहून गेली. नेपाळमधे तिबेटच्या तुलनेत जास्त माणसं मेली. पक्का न झालेला मृतांचा आकडा दोनेक हजारांचा आहे. ही घटना घडली तेव्हां गडगडाट झाला, भूकंप झाल्यासारखं वाटलं. ग्लेसियर (हिमनदी) सतत हळूहळू सरकत असते.एकाद्या ठिकाणी ग्लेसियरचा सरकण्याचा वेग वाढतो, ग्लेसियरच्या तळाशी असलेला डोंगर…