शहाण्या माणसानं लिहू नये!
‘शहाणा असशील तर लिहू नकोस.’ लेखक लोकेश शेवडे. प्रकाशक राजहंस प्रकाशन. ।। शहाणा असशील तर लिहू नकोस असं लेखक पुस्तकाच्या शीर्षकातून सांगतो आणि स्वतः मात्र १८६ पानं लिहून काढतो. इतकी पानं लिहितो त्या अर्थी लेखक शहाणा नाही असा अर्थ निघतो. ते खरंच आहे म्हणा. मराठी समाजाला न रूचणाऱ्या गोष्टी सांगण्याचा मूर्खपणा-शहाणपणा लेखकानं या पुस्तकात केलाय. अलिकडे सभोवताली भ्रष्टाचार,अनाचार, दादागिरी घडत असताना भारतीय माणसं गपगुमान कां असतात? माणसाची विचारशक्ती, विवेकी विचार करण्याची शक्ती कमी झालीय कां? माणसाला आपलं हित समजत नाही…