Browsed by
Author: niludamle

विस्कटलेला समाज सदृढ करण्याचा रघुराम राजन यांचा विचार

विस्कटलेला समाज सदृढ करण्याचा रघुराम राजन यांचा विचार

रघूराम राजन यांचं थ्री पिलर्स हे पुस्तक म्हणजे राज्यशास्त्र, अर्थ शास्त्र या विषयांची एक सहल आहे. राज्य (स्टेट), बाजार आणि समुदाय या समाजाच्या तीन घटकांचा इतिहास, त्यांची आजची स्थिती यांचा एक दीर्घ आढावा राजन यांनी घेतला आहे. बाजार,तंत्रज्ञान याचा संबंध राज्याशी येतो आणि हे दोन घटक मिळून समुदाय, समाज घडवतात. गेल्या वीसेक वर्षात तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण यामुळं खूप बदल घडले असून त्यामुळं समुदाय हा घटक मोडकळीला आला, विस्कटला आहे. तेव्हां समुदाय (community)सुदृढ व्हावा यासाठी काय करता येईल याचा विचार राजन…

Read More Read More

जेसिंडा आरर्न, बंडखोर प्रधानमंत्री.

जेसिंडा आरर्न, बंडखोर प्रधानमंत्री.

जेसिंडा आरर्न न्यू झिलंडच्या प्रधान मंत्र्यांनी (वय ३८ वर्षे) आत्ता आत्ता म्हणजे एप्रिल महिन्यात लग्न केलं. त्यांच्या नवऱ्याचं नाव क्लार्क गेफर्ड. गेफर्ड एक टीव्ही कार्यक्रम करतात. कार्यक्रमाचं नाव आहे, एक मासा एक दिवस. जेसिंडा आणि त्यांची बऱ्याच वर्षापासूनची ओळख आहे. या लग्नानं न्यू झीलंड आणि युकेमधल्या लोकांच्या भुवया वर गेल्या. कारण क्लार्क हा त्यांचा चार पाच वर्षांपासूनचा अधिकृत मित्र आहे, दोघं एकत्र रहात होते. २०१८ साली जून महिन्यात जेसिडांनी एका मुलाला जन्म दिला. मुलाचा पिता होता गेफर्ड. म्हणजे लग्न न…

Read More Read More

देव धर्म एक टाईमपास

देव धर्म एक टाईमपास

कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही अशी एक म्हण आहे. तरीही कावळे आणि माणसं शाप देतच असतात. गायी तर मरतातच,  वृद्ध होऊन किंवा रोग झाल्यानं किंवा कुपोषणामुळं. शाप देणारा मात्र स्वतःवर खुष होतो, आपल्या शापानं गाय मेली असं म्हणून समाधान पावतो. माणसाचा तळतळाट होतो तेव्हां माणूस त्रास देणाऱ्या माणसाचं तळपट होवो, त्याचं वाईट्ट वाईट्ट होवो असं म्हणतो. ती एक व्यक्त झालेली चीड असते. पण प्रज्ञा ठाकूर नावाची महिला लोकसभेची निवडणुक लढवतांना करकरे हा पोलिस अधिकारी आपल्या शापानं मेला असं म्हणते तेव्हा…

Read More Read More

लंकेतला दहशतवाद

लंकेतला दहशतवाद

२१ एप्रिलला लंकेत आठ ठिकाणी स्फोट झाले आणि त्यात २६० माणसं मेली. स्फोट चर्चमधे आणि हॉटेलांत झाले. ईस्टर संडेच्या सणाच्या प्रार्थनेसाठी जमलेली माणसं मेली. एक चर्च सर्वधर्मीय चर्च म्हणून ओळखलं जातं. तिथं मुस्लीम, हिंदू, बौद्ध माणसंही प्रार्थनेसाठी जमली होती. स्फोटात गुंतलेले दोघं होते  इल्हाम इब्राहीम आणि इन्शाफ अहमद हे दोन भाऊ. पाठीवर स्फोटकं घेऊन ते चर्चमधे पोचले आणि स्फोट घडवून आणला. तौहिद जमात ही जिहादी संघटना लंकेत खटपटी करत होती हे लंकेच्या पोलिसांना माहित होतं. किरकोळ स्फोट आणि पुतळे उध्वस्थ…

Read More Read More

एनरॉन. भारतात गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, त्यांची चौकशीही टाळता येते.

एनरॉन. भारतात गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, त्यांची चौकशीही टाळता येते.

एनरॉनच्या दाभोळ प्रकल्पाची चौकशी  सर्वोच्च न्यायालयानं थांबवलीय. १९९६ साली सुरू केलेल्या या चौकशीला आता अर्थ नाहीये असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं.   एक तर चौकशी सुरु झाली होती ती एनरॉनबरोबर महाराष्ट्र राज्य वीज मंडळानं केलेल्या खरेदी करारातील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी. आता एनरॉन दाभोलमधे नाही, दोन सरकारी उपक्रम मिळून दाभोल वीज निर्मिती केंद्र चालवतात. मूळ आरोपीच गायब. दुसरं म्हणजे शरद पवार, बाळ ठाकरे, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी अटल बिहारी वाजपेयी यांच्या वर्तनाची चौकशी न्यायालयीन चौकशीत व्हायची होती. त्या पैकी आता फक्त शरद…

Read More Read More

दोन हजारांची वस्ती चाळीस हजार पुस्तकं

दोन हजारांची वस्ती चाळीस हजार पुस्तकं

सू हेलपर्न न्यू यॉर्क राज्यातल्या एका डोंगरी खेड्यात रहायला गेल्या.   गाव आकारानं मोठं होतं पण माणसं होती फक्त २ हजार. २ हजार माणसं २ हजार चौरस मैलाच्या परिसरात पसरलेली. डोंगराळ वस्त्या अशाच असतात. एक डोंगर, खूप अंतरावर दुसरा डोंगर, मधे घळ. डोंगरावर किवा घळीत एकादं घर. दुसरं घर दिसतही नाही इतक्या अंतरावर. एकोणिसाव्या शतकात या गावात चामडी कमावण्याचे उद्योग होते, लाकूड कारखाने होते. गावात रोजगार मिळालाच तर मोसमी स्वरुपाचा असे. औद्योगीक अमेरिका श्रीमंत झाली पण दूरवर असलेल्या खेड्यांची स्थिती…

Read More Read More

अरे बाबा, राफेल हा देशसेवेचा मामला आहे

अरे बाबा, राफेल हा देशसेवेचा मामला आहे

राफेल प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं उकरलं आहे. हिंदू या पेपरानं बाहेर काढलेली माहिती आता सर्वोच्च न्यायालय तपासणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा राफेलची चर्चा होणार आहे. मुख्य विषय असा की राफेल विमानाच्या नेमक्या किमती काय, कितीनं वाढल्या, आणि कां वाढल्या. ही माहिती गुप्तता कायद्यानुसार लोकांसमोर ठेवता येत नाही असं सरकार म्हणालं. ही माहिती जाहीर झाली तर भारताच्या सुरक्षिततेला धोका आहे असं सरकारचं म्हणणं आहे.   जनतेला, विरोधी पक्षांना भारत सरकारनं राफेल खरेदी करायला हवं आहे, त्या खरेदीला कोणाचाही विरोध नाही. त्या विमानात शस्त्रास्त्रं…

Read More Read More

उतरणीवरचा भाजप. २०१९ ची निवडणूक वैचारिक घुसळण व ध्रुवीकरणाची सुरवात ठरावी.

उतरणीवरचा भाजप. २०१९ ची निवडणूक वैचारिक घुसळण व ध्रुवीकरणाची सुरवात ठरावी.

काँग्रेस या स्वातंत्र्य आंदोलनाचा जन्म १८८५ साली झाला. नाना विचार, नाना धर्म, नाना पंथ, नाना व्यक्तिमत्व काँग्रेस चळवळीत सामिल झाली. स्वातंत्र्य मिळालं आणि १९४७ साली काँग्रेस हा राजकीय पक्ष निर्माण झाला. माज आणि भ्रष्टाचार याची लागण १९५५ पासूनच सुरु झाली होती. नेहरू, शास्त्री व अन्य चारित्र्यवान आणि विचार करणाऱ्या नेत्यांनी पक्ष सावरला होता. ते गेले आणि घसरण सुरु झाली. इंदिरा गांधीनी पक्षाच्या घसरणीला गती दिली. व्यक्तिगत स्वार्थ आणि त्याला सिद्दांताची तकलुपी जोड यांचा वापर त्यानी केला. १९६७ साली काँग्रेसला झटका…

Read More Read More

गांधी आणि मोदींच्या गरीबी निर्मूलन योजना

गांधी आणि मोदींच्या गरीबी निर्मूलन योजना

नरेंद्र मोदीनी किसान सम्मान योजनेतहत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्याची घोषणा केली. गरीब शेतकऱ्याला हे पैसे दिले जातील. शेतकऱ्याला इतर वाटांनी अनुदानं किंवा मदत दिली जात असेल तर ती थांबेल काय? की इतर कुठल्याही प्रकारची मदत मिळत असली तरी स्वतंत्रपणे हे सहा हजार म्हणजे महिना पाचशे रुपये मिळतील?  शेतकऱ्याची दुर्दशा आहे कारण त्याच्याजवळ अगदी कमी जमीन आहे आणि ती जमिन कसून त्याचं पोट भरत नाही. सिंचन, वीज, बीबियाणं, खतं, जंतुनाशकं, कर्ज आणि शेतमालाला हमी भाव या बाबत सरकारनं अनुदानं,…

Read More Read More

नंदनवन, पुन्हा एकदा.

नंदनवन, पुन्हा एकदा.

UTOPIA FOR REALISTS RUTGER BREGMAN Pub: De Correspondent ।। आपल्या खिशात नसलेले पैसे खर्च करून आपल्याला आवश्यक नसलेल्या वस्तू खरीदायच्या; आपण ज्यांना सहन करू शकत नाही अशा माणसांवर इंप्रेशन मारण्यासाठी. नंतर आपलं मानसीक स्वास्थ्य बिघडलंय असं म्हणत मानसोपचारकाच्या खांद्यावर मान ठेवून रडायचं. ही आहे आजची संस्कृती, या अनावस्थेत आपण जगतोय. रटजर ब्रेगमन या नव्या दमाच्या अर्थविचाराच्या इतिहासाच्या अभ्यासकानं वरील वाक्यात आजचा काळ रंगवलाय आणि या दुरवस्थेबाहेर पडण्यासाठी एक नवी वाट सुचवलीय.  अर्थविचारात दोन तट आहेत. बाजारवादी आणि मार्क्सवादी. दोघांनाही समाजात…

Read More Read More