Browsed by
Author: niludamle

नसिरुद्दीनको गुस्सा क्यों आता है

नसिरुद्दीनको गुस्सा क्यों आता है

नसिरुद्दीन शहा प्रॅक्टिसिंग मुस्लीम नाहीत. ते मशिदीत जात नाहीत, मुस्लीम माणसं जे धार्मिक विधी वगैरे करतात ते ते करत नाहीत. त्यांना भौतिक जगात काही अडलं तर त्या बाबत ते देवाचा, प्रेषितांचा, देव आणि प्रेषित यांच्या वतीनं सांगितलेल्या गोष्टीचा सल्ला किंवा मार्गदर्शन ते घेत नाहीत. भारतीय राज्यघटना, कायदा आणि स्वतःची विवेकबुद्धी यांच्या आधारे ते जगतात. त्यांच्या हातून जे काही घडतं, ते जे काही करतात ते स्वतःच्या जबाबदारीवर करतात. घातक किंवा उपकारक असं काहीही त्यांच्या हातून घडलं तर ते त्यासाठी स्वतःला जबाबदार…

Read More Read More

चला, आघाड्या तयार करण्याचा मोसम आलाय

चला, आघाड्या तयार करण्याचा मोसम आलाय

चला, निवडणुक आली. कुठल्या आघाडीत जायचं ते ठरवा. देशव्यापी एकाद्या पक्षाचं राज्य असण्याचे दिवस संपलेत. भाजपच्या आघाडीनं बिहारमधलं लोकसभेचं जागा वाटप निश्चित केलंय. बिहारमधल्या ४० जागांमधल्या १७ जागा भाजपनं स्वतःकडं ठेवल्यात, १७ जागा नितीश कुमार यांच्या जदयुला दिल्यात आणि ६ जागा पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला दिल्यात. अगदी नेटकेच लोकसमता पार्टीचे कुशवाहा भाजप आघाडीतून बाहेर पडल्यानं त्यांना ५ जागा देण्याच्या संकटातून भाजप सुटला. लोकसमता पार्टी भाजप आघाडीला रामराम ठोकून काँग्रेस आघाडीत घुसलीय. काँग्रेस आघाडीचं जरा वेगळं आहे. बिहारमधली आघाडी काँग्रेस आघाडी…

Read More Read More

बाँब, रॉकेटांच्या सहवासात लढायांचं वृत्तांकन करणारी महिला पत्रकार

बाँब, रॉकेटांच्या सहवासात लढायांचं वृत्तांकन करणारी महिला पत्रकार

मेरी कोल्विन सीरियातल्या धुमश्चक्रीच्या बातम्या देताना २०१२ साली मृत्यूमुखी पडल्या. बाबा अमर या गावामधे तीनेकशे स्त्रिया आणि मुलं सीरियन सरकारनं अडकवून ठेवली होती, बाँब वर्षाव करून त्यांना असद यांच्या सैनिकांनी मारलं. मेरी कोल्विन यांनी त्या घटनेचा वृत्तांत प्रसिद्ध केल्यावर सीरियन सरकार खवळलं. ड्रोनचा वापर करून सरकारनं त्यांचा पत्ता मिळवला, त्या घरावर अर्धा तास अनेक रॉकेट्सचा मारा करून घर आणि मेरी कोल्विनला खलास केलं. मेरी कोल्विननी लिबिया, इराक, कोसोवो, चेचन्या, पॅलेस्टाईन, सिएरा लिओने, इथियोपिया, लंका इत्यादी देशातल्या युद्धांवर वृत्तांत लिहिले. लंकेत…

Read More Read More

ब्रेक्झिट. ब्रिटीश नेते, ब्रिटीश खासदार, ब्रिटीश समाज, यांचं हसं होतंय.

ब्रेक्झिट. ब्रिटीश नेते, ब्रिटीश खासदार, ब्रिटीश समाज, यांचं हसं होतंय.

ब्रेक्झिटचा घोळ आता ब्रेक्झिट हा एक विनोद झाला आहे. एकाद्या देशाचं इतकं हसं यापुर्वी कधी झालं नसेल. २०१७ मधे ब्रीटननं युरोपीय युनीयनमधून (युयु) बाहेर पडायचा निर्णय घेतला. तोही जनमत चाचणीनंतर. युयुमधे रहायचं असं सुमारे ४८ टक्के लोक म्हणत होते आणि राहू नये असं ५२ टक्के लोक म्हणत होते. म्हणजे अगदीच निमुळत्या बहुमतानं निर्णय झाला. हा निर्णय अमलात आणण्याची जबाबदारी थेरेसा मे यांनी घेतली, त्यासाठी त्या पंतप्रधान झाल्या. २०१९ च्या मार्चमधे बाहेर पडायचं ठरलं आणि त्यासाठी लागणारे कागद, करार, देवाणघेवाण यांच्या…

Read More Read More

गोरक्षण, सबरीमाला, राममंदीर. दांडगाई नको.

गोरक्षण, सबरीमाला, राममंदीर. दांडगाई नको.

दांडगाई करणाऱ्यांना आवरा. उत्तर प्रदेशात बुलंदशहरमधे एका पोलिस ठाण्यावर नागरिकांनी हल्ला केला, ठाण्याला आग लावली. पोलिस आणि नागरीक यांच्यात धुमश्चक्री झाली, गोळीबार झाला. गोळीबारात दोन जण ठार झाले पैकी एक पोलिस अधिकारी होता. योगेश राज या नावाच्या बजरंग दलाच्या एका तरूण कार्यकर्त्याच्या पुढाकारानं ही घटना घडली. योगेश राजला गावात प्राण्यांचे सांगाडे सापडले. योगेश राजचं म्हणणं होतं की ते गायीचे सांगाडे होते. योगेश काही लोकांना घेऊन पोलिस ठाण्यात गेला. पोलिसांनी गोहत्या करणाऱ्यांना पकडावं, शिक्षा करावी अशी योगेशची मागणी होती. केवळ कोणीतरी…

Read More Read More

दी इकॉनॉमिस्टचा १७५वा वाढदिवस

दी इकॉनॉमिस्टचा १७५वा वाढदिवस

दी इकॉनॉमिस्ट या सुरवातीला लंडनहून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकानं १७५ वर्षं पूर्ण केली. पावणेदोनशे वर्षाच्या काळात सारं जग अनेक स्थित्यंतरांतून गेलं. बहुतेक सगळी स्थित्यंतरं इकॉनॉमिस्टनं नोंदली, अभ्यासली. इकॉनॉमिस्टचे मालक संपादक विल्सन हे खटपट्ये, समाजात बदल घडवू पहाणारे सक्रीय कार्यकर्ते होते. कार्यकर्ता, विचारवंत आणि पत्रकार असं मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्वात होतं. अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, ब्रीटननं घडवलेली औद्योगीक क्रांती या घटनांनी सारं जग बदलून टाकलं. जगभरात नवनवे विचार आणि विचारधारा या प्रसंगांतून जन्माला आला. या घालमेलीत लिबरलिझमचा विचार विल्सन यांनी घडवला. अॅडम स्मिथ,…

Read More Read More

पाकिस्तानातलं धर्मनिंदा प्रकरण

पाकिस्तानातलं धर्मनिंदा प्रकरण

पाकिस्तानचा धर्मनिंदा कायदा, त्या कायद्याचा वापर, त्याचा अमल इत्यादी गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत, आसिया बीबीला पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयानं निर्दोष ठरवून सोडल्यावर. आसिया बीबीवर खटला झाला होता, तिनं धर्मनिंदा केली म्हणून. खालच्या दोन न्यायालयांनी तिला दोषी ठरवून फाशी जाहीर केल्यावर २००९ मधे ती तुरुंगात गेली. खटला सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयानं तिची सुटका केली. त्यानंतर घडलेलं रामायण नंतर पाहूया. पण त्या आधी घटना काय होती ते पाहूया. आसिया बीबी नानकाना जिल्ह्यातल्या गावात शेतमजुरी करत असे….

Read More Read More

सीरिया यादवी युद्धातल्या होरपळीतलं माणसांचं जगणं

सीरिया यादवी युद्धातल्या होरपळीतलं माणसांचं जगणं

No Turning Back LIFE, LOSS, AND HOPE IN WARTIME SYRIA Rania Abouzeid  ।। २०११ पासून सीरियात यादवी चालली आहे. पाच लाख माणसं या यादवीत मारली गेली. त्यातली बहुतांश सरकारच्या गोळ्या आणि छळाला बळी पडली. दीडेक कोटी माणसं बेघर झाली. बहुतेकांची गावंच उध्वस्थ झाल्यानं त्यांना सीरियात इतरत्र जावं लागलं किंवा परदेश गाठावा लागला. रानिया अबुझैद या पत्रकार महिलेनं यादवीवर लिहिलेलं पुस्तक सीरियन यादवी घडत असताना सीरियन समाज ती कशी सहन करत होता, कशी जगत होता ते दाखवतं. सामान्यतः जनतेला युद्ध या…

Read More Read More

अमेरिकन मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा

अमेरिकन मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा

अमेरिकेतली मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली. अधांतरी अशासाठी की संसदेच्या दोन सभागृहांमधलं काँग्रेस हे सभागृह डेमॉक्रॅट्सच्या ताब्यात गेलं आणि सेनेट हे सभागृह रीपब्लिकनांच्या ताब्यात राह्यलं. ही निवडणुक ट्रंप या विषयावर होती. ट्रंपच्या बाजूनं कोण आणि विरोधातले कोण या मुद्द्यावर मतदान झालं. या निवडणुकीचे काही विशेष आहेत. काँग्रेसमधे १०२ महिला निवडून आल्यात. अमेरिकेत महिलांना राखीव जागा नसतांना महिला प्रतीनिधींची संख्या वाढतेय हे विशेष. बहुतेक प्रतिनिधी, दोन वगळता, डेमॉक्रॅटिक आहेत. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्या प्रथमच स्थानिक आदिवासी म्हणजे मूळ निवासी महिला निवडून…

Read More Read More

अमीत शहा, निवडणुका खुश्शाल जिंका, पण कृपया हिंदू समाजाला चिखलात लोटू नका.

अमीत शहा, निवडणुका खुश्शाल जिंका, पण कृपया हिंदू समाजाला चिखलात लोटू नका.

अमित शहा म्हणाले की अमल होणार नाहीत असे निर्णय न्यायालयानं देऊ नयेत. संदर्भ होता सबरीमाला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय. रजस्वला स्त्रीनं अय्यपाच्या दर्शनाला जाऊ नये अशी परंपरा कोणी तरी कधी तरी तयार करून ठेवली होती. रजस्वला स्त्रीला महिन्याला पाळी येते तेव्हां रक्तस्राव होतो, म्हणजे ती स्त्री अशुद्ध असते, म्हणून तिनं अयप्पाकडं जाता कामा नये असं परंपरा सांगते. ही परंपरा शास्त्रीय ज्ञानाच्या अभावी निर्माण झाली होती. पाळी येणं नैसर्गिक असतं, त्यात पाप पुण्य,शुद्धाशुद्धतेचा संबंध नाही हे विज्ञानानं सांगितल्याचा आधार घेऊन…

Read More Read More