Browsed by
Author: niludamle

कार्यक्षमता. किती नफा, किती तोटा.

कार्यक्षमता. किती नफा, किती तोटा.

कार्यक्षमता, किती नफा, किती तोटा. The Efficiency Paradox: What Big Data Can’t Do Edward Tenner एफिशियन्सी म्हणजे कार्यकुशलता, कार्यक्षमता. कार्यक्षमतेमुळं कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त फायदा मिळतो, कमीत कमी निविष्टा करून जास्तीत जास्त उत्पादन मिळतं, प्रत्येक युनिट साधनापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळवतं. मानवी समाजव्यस्था कार्यक्षमतेच्या विचारानं पछाडलेली आहे. एडवर्ड टेनर त्यांच्या एफिशियन्सी पॅरॅडॉक्स या पुस्तकातून या पछाडलेपणाला, जुनूनला, आव्हान दिलय. कार्यकुशलता वाढावी, जास्तीत जास्त नफा मिळावा, जास्तीत जास्त उत्पादन मिळावं, जास्तीत जास्त आराम मिळावा यासाठी माणसानं यंत्रं शोधली, तंत्रं शोधली,…

Read More Read More

” इकॉनॉमिस्ट ” ची दीडशे वर्षांची वाटचाल सांगणारं पुस्तक

” इकॉनॉमिस्ट ” ची दीडशे वर्षांची वाटचाल सांगणारं पुस्तक

The Pursuit of Reason:The Economist 1843-1993 Ruth Dudley Edwards || इकॉनॉमिस्ट या पेपरच्या स्थापनेपासून (१८४३) ते १९९३ साली प्रकाशनाला १५० वर्षं पूर्ण होईपर्यंतचा इतिहास एडवर्डस यांनी या पुस्तकात मांडला आहे. १८४३ साली सुरवातीला इकॉनॉमिस्टचा खप १७५० होता. २०१८ साली तो पाच लाखाच्या पलीकडं आहे. माहिती आणि माहितीचा अर्थ सांगणाऱ्या या साप्ताहिकानं देशाची सीमा कधीच मानली नाही. मुक्त अर्थव्यवस्था, मुक्त व्यापार हे पेपरचं मुख्य सूत्र राहिलं, तो ज्या देशात निघाला तो ब्रीटन हे या पेपरचं मुख्य सूत्र कधीच नव्हतं. आज साऱ्या…

Read More Read More

स्टरलाईट अनर्थ. टाळता येणं शक्य आहे.

स्टरलाईट अनर्थ. टाळता येणं शक्य आहे.

तुतीकोरीनमधला,  स्टरलाईट कंपनीचा, खनीजापासून तांबं मिळवण्याचा उद्योग,  तामिलनाडू सरकारनं बंद केला आहे. सुमारे सात हजार माणसं बेकार झाली आहेत. उद्योगानं होणाऱ्या प्रदुषणाचा त्रास सहन करणाऱ्या लोकांनी केलेल्या आंदोलनात १३ माणसं मेली, शेकडो जखमी झाली. उद्योग बंद होणं हा त्याचा परिणाम. सुखरूप जिवंत रहाणं (स्थानिकांचं) आणि रोजगार (स्थानिकांचा) आणि फायदे (देशभराला होणारे) या तिहींपैकी स्थानिकांचं सुखरूप जिवंत रहाणं निर्णायक ठरलं. नीरी (नॅशनल एनवायरनमेंटल इंजिनियरिंग रीसर्च इन्सटिट्यूट) या केंद्र सरकारच्या संस्थेनं दोन तीन वेळा दिलेल्या अहवालात स्टरलाईटनं हवा, जमिन, पाणी यांचं प्रदुषण…

Read More Read More

महाराष्ट्रातील शेती, शेतकरी,पाणी समस्या आणि पाणी फाऊंडेशन

महाराष्ट्रातील शेती, शेतकरी,पाणी समस्या आणि पाणी फाऊंडेशन

आमिर खान यांचं पाणी फाऊंडेशन सध्या गाजतय. अनेक गावांमधे शेतकऱ्यांना पाणी अडवायला, पाणी साठवायला पाणी फाऊंडेशन प्रेरित करत आहे.  आमिर खान यांना चित्रपट कला चांगलीच अवगत असल्यानं आणि  त्याना टाटा, अंबानी, महाराष्ट्र सरकार यांचाही पाठिंबा असल्यानं त्यांचा तुफान आलंया हा कार्यक्रम गाजतोय. पाणी फाऊंडेशननं खेड्यात पाणी जिरवा, पाणी वाचवा ही मोहीम सुरू केलीय, जलसंधारणाची कामं सुरु केलीत. गावातल्या लोकांनी श्रमदान करून, प्रसंगी कामासाठी आवश्यक डिझेल इत्यादी गोष्टी वर्गणी करून कामं पार पाडली. फाऊंडेशन खेड्यातल्या लोकांना तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण देतं. पैसे…

Read More Read More

इराण अणुकरार मोडणं म्हणजे काय

इराण अणुकरार मोडणं म्हणजे काय

इराणबरोबर २०१५ साली झालेल्या बहुराष्ट्रीय अणुकरारातून अमेरिकेनं काढता पाय घेतला आहे. काय होता हा करार? अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, युके, रशिया, चीन या देशांच्या सहमतीनं झालेल्या या करारानुसार इराणनं  तयार केलेली अणुव्यवस्था  अणुशस्त्र निर्मितीकडं (वॉरहेड्स) वळवायची नाही आणि त्या दिशेनं तयार केलेली उभारणी विघटित करायची.  इराण कराराचं पालन करत आहे की नाही हे पहाण्यासाठी आंतरराष्ट्रीय, तटस्थ निरीक्षक इराणमधे पाठवले जातील व त्यांना तपासणीसाठी मुक्त वाव असेल असंही करारात ठरलं होतं. या बदल्यात अमेरिका  इत्यादी देशांनी इराणवर लादलेले निर्बंध काढून घ्यायचे असं…

Read More Read More

अजूनही जगात परक्यांना शत्रू न मानणारी माणसं आहेत

अजूनही जगात परक्यांना शत्रू न मानणारी माणसं आहेत

साजिद जाविद ब्रीटनचे गृहमंत्री झाले आहेत. त्यांच्यामुळं गोरा नसलेला पहिला आशियाई माणूस ब्रीटनमधे गृहमंत्री झाला आहे. जाविद यांचे आई वडील मुळचे भारतीय. नंतर ते पाकिस्तानात गेले. तिथून ते साठच्या दशकात ब्रीटनमधे स्थलांतरीत झाले. त्यांचे वडील बस ड्रायव्हर होते, आहेत.  राजकारणात येण्यापूर्वी ते इनवेस्टमेंट बँकर होते. जाविद तेरेसा मे यांचे समर्थक आहेत, उजवे सनातनी आहेत. गृहमंत्री होण्याआधी त्यांनी घरबांधणी, सांस्कृतीक या खात्यांच्या मंत्रीपदी काम केलं आहे. गृहमंत्रीपद त्यांना सहजासहजी मिळालेलं नाही. आधीच्या गृहमंत्री अँबर रड यांना स्थलांतरीतांच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करणं या…

Read More Read More

रजनीशांना अमेरिकेनं कां हाकलून दिलं?

रजनीशांना अमेरिकेनं कां हाकलून दिलं?

ओशो ऊर्फ आजार्य रजनीश यांचं  निधन होऊन पाव शतक होऊन गेलंय.  त्यांच्या पुस्तकांचे ४० भाषांत अनुवाद प्रसिद्ध होत आहेत, पुस्तकं आणि व्हिडियो जगभर  लाखोनी खपत आहेत, त्यांच्या अनुयायांचे आश्रम जगभर उभे रहात आहेत, अनुयायांची संख्या वाढत आहे. जिवंतपणी त्यांना खूप विरोधक होते, आता विरोधकांची संख्या मावळते आहे. . ओशो कां वादग्रस्त होते याचा काहीसा पत्ता नेटफ्लिक्सनं प्रदर्शित केलेल्या डॉक्युमेंटरीतून लागतो. डॉक्युमेंटरीचं नाव आहे वाईल्ड वाईल्ड कंट्री. प्रत्येकी एक तासाचे सहा भाग. मुख्यतः ओशोंच्या १९८१ ते १९८५ या काळातील अमेरिकेतील ओरेगन…

Read More Read More

ऑक्टोबर. कथा, कविता आणि डॉक्युमेंटरी.

ऑक्टोबर. कथा, कविता आणि डॉक्युमेंटरी.

‘ ऑक्टोबर ‘ हा  प्राजक्ताची फुलं  जपणाऱ्या एका मुलीचा, तिच्या आईचा आणि तिच्या एका मित्राचा सिनेमा आहे. शिवली ही पंचतारांकित हॉटेलमधे हॉटेल  व्यवसाय शिकणारी उमेदवार मुलगी आहे. तिची आई आयआयटीत प्रोफेसर आहे. शिवली हुशार आहे, बुद्धीमान आहे, कामं नीटनेटकेपणानं करणारी मुलगी आहे. हॉटेलात त्यांचा एक तरुण गट आहे. दिल्ली या धकाधकीच्या शहरात ती मुलं आपलं आयुष्य कोरण्याच्या प्रयत्नात आहेत. तिच्या धडपडीत डॅन नावाचा एक इरॅटिक मुलगा तिचा सहकारी आहे. डॅनबद्दल शिवलीला उत्सूकता आहे, प्रेम आहे की माहित नाही. डॅन मात्र…

Read More Read More

साधूंच्या हातात राज्य

साधूंच्या हातात राज्य

  नामदेव दास त्यागी हा माणूस त्याच्या ड्रेसवरून साधू आहे असं दिसतं. कपाळावर भस्माचे पट्टे असतात. जटा आहेत.  न शिवलेलं वस्त्र गुंडाळतात. गळ्यात रुद्राक्षाच्या आणि कसल्या कसल्या तरी मण्यांच्या माळा असतात. त्यांच्याकडं एक लॅपटॉप नेहमी असतो. लोक त्यांना कंप्यूटर बाबा म्हणतात. त्यांच्याकडं एक हेलीकॉप्टरही आहे. कंप्यूटर बाबांना मध्य प्रदेशच्या लोकांची सेवा करायची आहे, पारमार्थिक किंवा अद्यात्मिक नव्हे, ऐहिक सेवा. २०१४ साली त्यांनी सेवा करता यावी म्हणून केजरीवाल यांच्याकडं आम आदमी पार्टीचं तिकीट मागितलं. मिळालं नाही.  त्यांनी भाजपशी जुळवून घ्यायचा प्रयत्न…

Read More Read More

कठुआ, उन्नाव, खैरलांजी. या देशात गुन्हेगारांना शिक्षा होत नाही.

कठुआ, उन्नाव, खैरलांजी. या देशात गुन्हेगारांना शिक्षा होत नाही.

कठुआ पोलिसांनी दाखल केलेली माहिती अशी. रासना गावातल्या संजीराम नावाच्या माणसानं त्याचा भाचा शुभमला सांगितलं की असिफा नावाची मुलगी आपल्या घराच्या पाठीमागच्या बाजूला घोडे चारण्यासाठी येत असते. तिच्यावर बलात्कार कर. बलात्कार करण्यासाठी गुंगी आणणारी औषधं विकत घेऊन ये. हे कृत्य लपून ठेवणं आणि कृत्यं करणाऱ्यांची सुटका होणं यासाठी संजीराम यांनी पाच लाख रुपये योजले. पोलिस खात्यात त्यांची माहितीची माणसं होती. त्यांना पैसे देण्याचं योजलं. १० जानेवारी २०१८ रोजी असिफा दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला गावाला लागून असलेल्या जंगलात घोडे घेऊन गेली…

Read More Read More