प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन. सर्वांना मतं हवीयत.
खरं म्हणजे प्रकाश आंबेडकर हे डॉ. आंबेडकरांचे अनुयायी. त्यांना देवाधर्माबद्दल आस्था असण्याची अपेक्षा नाही. मतदार, हिंदू पंथ मानणारे, आपल्याकडं यावेत यासाठी त्यांनी पंढरपूरचं मंदीर उघडावं यासाठी सत्याग्रह केला. काही तासांचाच. हज्जारो माणसं गोळा केली. अपेक्षेप्रमाणं सरकारनं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं व यथावकाश विचार करून मंदीराचे दरवाजे उघडू असं सांगितलं. लॉकडाऊन हळूहळू कधी तरी उघडायचं होतंच, त्या वेळापत्रकात पंढपुरच्या विठोबाला सरकारनं घातलं. येवढंच. प्रकाश आंबेडकर आणि सरकार, दोघंही खुष. प्रकाश आंबेडकरांच्या सत्याग्रहाच्या वेळी लोकं अंतर बाळगणं, मास्क लावणं इत्यादी गोष्टींकडं पूर्ण…