केजरीवाल
केजरीवाल हा एक इवेंट आहे. इमरजंट आहे. अनेक लोकांनी स्वतंत्र हेतू बाळगून केलेल्या हालचालीतून ही घटना घडली आहे. केजरीवाल सत्ता स्थापन करतील असं लोकांना वाटलंही नसणार. लोकांच्या ढोबळ अपेक्षा तेवढ्या केजरीवालांना माहित होत्या. म्हणजे वीज, पाणी इत्यादी. परंतू त्याच माणसांना केजरीवाल यांनी मंत्री म्हणून कसं वागावं या बद्दलही अपेक्षा होत्या. त्या काही मतदानात प्रतिबिंबित झालेल्या नव्हत्या. त्यांना अपेक्षित नसलेल्या अनेक गोष्टी केजरीवाल करत जातील कारण त्या गोष्टी करू नयेत असं काही लोकांनी त्यांना सांगितलेलं नव्हतं. कोणाला नुसतं पाणी हवं होतं,…