सिनेमा: हॉलिवूडचा इतिहास सांगतो ‘बॅबिलॉन’.

सिनेमा: हॉलिवूडचा इतिहास सांगतो ‘बॅबिलॉन’.

मूकपटाचं बोलपट हॉलिवूड वळण. बॅबिलॉन. डेमियन शॅझेल या दिक्दर्शकाचा बॅबिलॉन हा चित्रपट थेटरांत झळकला आहे. झळकताक्षणीच चित्रपटाची चर्चा सुरु झालीय आणि यंदाच्या ऑस्कर स्पर्धेत तो नामांकनं मिळवणार, बक्षिसं मिळवणार अशी भाकितं वर्तवली जात आहेत.एका परीनं ते स्वाभाविक आहे. पाचच वर्षांपूर्वी शॅझेलच्या ला ला लँडनं प्रेक्षकांना आणि ऑस्कर परीक्षकांना वेड लावलं होतं. अनेक बक्षिसांसह शॅझेल ऑस्करचा सर्वोत्तम दिक्दर्शक झाला होता. हॉलिवूड चित्रपट सृष्टीत मूक सिनेमा संपून बोलपट सुरु झाला त्या काळाच्या (विशीचं-तिशीतलं हॉलिवूड)  आठवणी जागवत हा चित्रपट त्या काळात सिनेमा करणाऱ्यांचं  चित्र प्रेक्षकांसमोर…

Read More Read More

एकहाती देश उभारणारा नेता.

एकहाती देश उभारणारा नेता.

होऊन गेलेल्या मोठ्या नेत्यांची चरित्र वाचणं उदबोधक असतं. नेता काळाच्या पडद्याआड गेल्याला बराच काळ लोटल्यानंतर त्या नेत्यांकडं अंतर ठेवून, तटस्थपणे पहाता येतं. त्यामुळं त्या नेत्याचं योग्य मोजमाप शक्य होतं. नेत्यांनी केलेली कामं काळाच्या ओघात टिकली असतील तर त्या नेत्याबद्दलचा आदर वाढतो.चरित्र वाचतांना एक गोष्ट तर नक्कीच होते. वर्तमान काळ समजायला  चरित्रं मदत करतात. हेन्री किसिंजर यांनी लिहिलेल्या लीडरशिप या पुस्तकात जगातल्या सहा राष्ट्रप्रमुखांचं कर्तृत्व चरित्र रेखाटलं आहे. आपल्या सर्वाना माहित आहे की हेन्री किसिंजर अमेरिकेचे परदेश मंत्री होते, अमेरिकन अध्यक्षांचे सल्लागार…

Read More Read More

फरा आणि काश्मिर फाईल्स

फरा आणि काश्मिर फाईल्स

फरा (Farah) याच शीर्षकाचा चित्रपट , फरा या १४ वर्षाच्या पॅलेस्टिनी मुलीची गोष्ट सांगतो. गोष्ट सरळ रेषेत जाणारी आहे. १९४८ साल आहे. स्थळ आहे पॅलेस्टाईन. बाहेरून आलेल्या ज्यूंनी पॅलेस्टाईन  भूमीचा ताबा घेतलाय. एकेका गावात घुसून ते स्थानिक पॅलेस्टिनी लोकांना ठार करतात, त्यांच्यावर अत्याचार करतात.   त्यांना मारून टाकतात. त्यांना गाव सोडून निघून जायला सांगतात. गावाचा कब्जा घेतात. तिथं इस्रायल नावाचा देश तयार करतात. सात लाख पॅलेस्टिनी या घटनाक्रमात मारले गेले/  विस्थापित झाले. इस्रायलनं पॅलेस्टाईन व्यापणं आणि त्यात झालेली हिंसा या  घटनेचं वर्णन अरबी भाषेत नकबा असं करतात….

Read More Read More

मुंबईची वाट लावणारा विकास

मुंबईची वाट लावणारा विकास

मुंबईची वाट लावणारा विकास मुंबईत, वरळी परिसरात, १६ हजार ५५७ कुटुंब तीन मजली चाळीत रहातात. घरात संडास नसलेल्या एक खोलीच्या या घराचं क्षेत्रफळ १६० चौरस फूट आहे. या वस्तीला बीडीडी चाळी असं म्हणतात. १९२० साली ब्रिटिशांनी या चाळी बांधल्या. चाळी बांधण्यासाठी  बाँबे डेवलेपमेंट डिरेक्टरेट स्थापलं, त्यावरून या चाळींना बीडीडी चाळी असं नाव पडलं. त्या वेळी मुंबई म्हणजे सात बेटं होती. बेटांमधल्या समुद्रात भर घालून जमीन तयार करण्यात आली, तिथं  कामगारांसाठी ही घरं बांधण्यात आली. आजही या इमारतींच्या मूळ भिती मजबूत आहेत, पण…

Read More Read More

हिटलर माझा शेजारी…

हिटलर माझा शेजारी…

गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माय नेबर ॲडॉल्फ हा चित्रपट दाखवण्यात आला. ॲडॉल्फ म्हणजे ॲडॉल्फ हिटलर…. काल परवापर्यंत एक बातमी मधेमधे येत असे. नेताजी सुभाषचंद्र बोस अजून जिवंत आहेत. अमूक ठिकाणी आश्रमात रहातात, तमूक ठिकाणी ते बाजारात दिसले.  एकादा माणूस किंवा एकादी घटना जेव्हां गूढ असते, रहस्य झालेली असते तेव्हां अशा बातम्या उठत रहातात. त्यातूनच कॉन्स्पिरसी सिद्धांत, कारस्थान सिद्धांत जन्मतात. नेताजींचा मृत्यू झालेला नाही, ते योग्य  परिस्थिती निर्माण झाल्यावर प्रकट होतील असं कारस्थान सिद्धांत सांगू लागतो. हिटलरच्या मृत्यूबाबतही असेच सिद्धांत नाझींनी…

Read More Read More

पृष्ठभागाच्या खाली काही तरी घडतय.

पृष्ठभागाच्या खाली काही तरी घडतय.

जनतेच्या मनात काय दडलंय? भाग ३. राजकीय प्रभाव, परिणाम? धुप्पा,   हिप्परगा (माळ), रामतीर्थ, पार्डी, डोंगरकडा नायगाव, या गावातल्या लोकांशी बोललो. विविध ठिकाणी. त्यासाठी फार चहा प्यावा लागला. दुधाच्या चहाचा वीट आल्यावर बहुतेकांनी छोट्या ग्लासातून अर्धा ग्लास डिकॉक्शन पाजलं. म्हणजे बिनदुधाचा काळा चहा.  लोकांना राहुल गांधीबद्दल कुतुहुल होतं.  ‘येवढा मोठा माणूस. टीव्हीवर दिसणारा. वडील, आजी, पणजोबा, पंतप्रधान. असा माणूस रस्त्यावर चालतो, लोकांच्याबरोबर, लोकांमधे मिसळतो. पाहुया तरी हा बाबा कोण आणि कसा आहे. छान वाटलं त्याला पहाताना भेटताना’  राहुलबद्दल लोकांना प्रेम आपुलकी निर्माण झाली…

Read More Read More

जनतेच्या मनात काय दडलंय?

जनतेच्या मनात काय दडलंय?

भाग २ यात्रेचा एक मुक्काम शंकर नगर परिसरात होता. १९८० च्या सुमारास त्या काळातले मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे जावई भास्करराव पाटील खतगावकर यांनी या परिसरात साखर कारखाना उभा केला. त्यावरून या परिसराचं नाव शंकर नगर असं पडलं. सुमारे १५०० माणसांना या कारखान्यामुळं काम मिळत होतं. प्रारंभी तो चांगला चालला, २००५ साली बंद पडला,  रोजगार गेला. कारखान्यावरचं सहकारी बँकेचं कर्ज अजूनही फिटलेलं नाही. कारखान्याच्या परिसरात खतगावकर यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या. त्या संस्था मात्र व्यवस्थित चालतात.   कारखान्याच्या परिसरात यात्रेकरूंच्या रहाण्याची गाड्या पार्क करण्याची,…

Read More Read More

जनतेच्या मनात काय दडलंय? भाग १.

जनतेच्या मनात काय दडलंय? भाग १.

भाग १. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात ७ ते ११ नव्हेंबर इतका काळ चालली.  देगलूर, नांदेड, नायगाव ही शहरं; वन्नाळी, अटकळी, भोपाळा, रामतीर्थ, धुप्पा, हिप्परगा (माळ)नरसी,नायगाव, पार्डी इत्यादी दहाबारा छोटी गावं या मार्गात होती. राहूल गांधी नांदेडमधे १२५ किमी चालले. ६ विधानसभा मतदारसंघ आणि ३ लोकसभा मतदार संध या यात्रेत होते. सकाळी यात्रा सुरू होत असे, दुपारी विश्रांती. संध्याकाळी यात्रेचा दुसरा टप्पा. रात्री विश्रांती.  सकाळी एक नाका सभा, संध्याकाळी एक नाका सभा, दुपारी पत्रकार परिषद आणि निवडक लोकांशी चर्चा. रात्री एकादी मोठ्ठी जाहीर सभा. अशी…

Read More Read More

राजा राणींचं खाजगी जगणं पडद्यावर, क्राऊन.

राजा राणींचं खाजगी जगणं पडद्यावर, क्राऊन.

क्राऊन या मालिकेचा पाचवा सीझन सुरु झाला आणि पहिल्याच दिवशी ११ लाख ब्रिटिशांनी तो पाहिला. अर्थात नंतरही ही मालिका पाहिली जाणार आहे. सीझन ब्रिटीश राणीच्या जीवनावर असल्यानं तो  ब्रिटीश माणसं चवीनं पहाणार, पण या मालिकेच्या देखणेपणामुळं जगातले इतरही लोक ती चवीनं पहात आहेत. जगभरच्या लोकांना ती पहावीशी वाटतेय कारण ती चटकदार आहे, तिच्यात थरार आहे, तिच्यात राजकारणाचे पृष्ठभागाखालचे थर पहायला मिळतात.अर्थात हेही सत्य आहे की इतिहास माहीत असायला हवा. पाचव्या सीझनमधे आपल्याला युवराज चार्ल्स, राणीला सिंहासानावरून उतरवायचा प्रयत्न करतोय असं…

Read More Read More

एका गुंडाला अमेरिकन मतदारांनी रोखलं

एका गुंडाला अमेरिकन मतदारांनी रोखलं

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डेमॉक्रॅट्स आणि रिपब्लिकन या पक्षांना सेनेटमधे(संसदेचं वरिष्ठ सदन) समसमान जागा मिळाल्यात. काँग्रेसमधे (संसदेचं कनिष्ठ सदन) रिपब्लिकनांना सुमारे १५ जागा अधिक मिळाल्या आहेत. काही जागांचे निकाल अजून बाकी आहेत. परंतू एकूणात जीत आणि हार यातला फरक नगण्यच असेल.  निवडणुकपूर्व स्थिती आणि अंदाज सांगत होते की रिपब्लिकनांकडं मतांचा पूर येईल. काही रिपब्लिकन धार्जिणे गट सांगत होत की नुसता पूर नव्हे तर सुनामी येईल आणि डेमॉक्रॅटिक पक्ष वाहून जाईल. तसं झालेलं दिसत नाही. रिपब्लिकनांना अपेक्षा होती तेवढी मतं मिळालेली नाहीत….

Read More Read More