पुस्तक पोलीस खात्याची पुनर्रचना व्हायला हवी
Keeping India Safe Vappala Balchandran Harper Collins 328 Pages. Rs. 335 kindle {} प्रस्तुत पुस्तकाची पहिली आवृत्ती २०१७ साली प्रसिद्ध झालीय. पण आजच्या परिस्थितीत ते पुस्तक वाचनीय झालं आहे. भारतीय पोलिस सेवेतले (आयपीएस) अधिकारी वप्पाला बालचंद्रन यांनी हे पुस्तक लिहिलंय. ते केंद्रीय कॅबिनेटचे सल्लागार होते आणि मुंबईवरच्या दहशतवादी हल्याच्या चौकशी समितीचे सदस्य होते. ते इंटेलिजन्स विभागामधे होते. त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे. भारतात सुरक्षेबाबत नीट विचार झालेला नाही, सुरक्षेसाठी आवश्यक संस्थात्मक रचना झालेली नाही. भारतातली पोलीस व्यवस्था अकार्यक्षम आहे. ऐन…