केजरीवाल
केजरीवाल सतत म्हणतात की त्यांना आंदोलनं करायची, निवडून यायची हौस नाही. भ्रष्टाचार होतोय, अगदी दैनंदिन गरजाही नागरिकांना भागवता येत नाहीत म्हणून त्यांना हे उद्योग करावे लागतायत. राजकीय व्यवहार आणि व्यवस्था यात सुधारणा झाल्यास आपल्याला कामच उरणार नाही असं केजरीवाल म्हणतात. लोकांनी भ्रष्ट लोकांना संसदेपासून दूर ठेवल्यानंतर आप पार्टीची जरूरच शिल्लक रहाणार नाही, ती पार्टी बरखास्त करता येईल आणि केजरीवालही आपल्या इतर कामाला लागतील. एक राजकीय पक्ष काढायचा, वाढवायचा,चालवायचा यात त्यांना रस नाही. त्यांना सरकारात रस नाहीये, जे कोणतं सरकार तयार…