गारपीट, नुकसान आणि भरपाई यंदाची गारपीट अभूतपूर्व आहे. इतक्या मोठ्या प्रदेशावर आणि इतके दिवस गारपीट झाल्याचं कोणालाही आठवत नाही. पडलेल्या गारा अर्धा किलो, पूर्ण किलो या वजनाच्या आणि आकाराच्या होत्या. गारांच्या या वजनामुळं कच्ची छपरं, पत्र्याची छपरं कोसळली, कच्च्या भिंती कोसळल्या. या वजनामुळं माणसंही मेली. असं पूर्वी घडलेलं नाही. सामान्यतः गारा लहान असल्या आणि पटकन पडून गेल्या तर पिकाचं नुकसान होत नाही. पण या अभूतपूर्व वजनदार गारांमुळं ज्वारीसारखी पिकं जमीनदोस्त झाली. द्राक्ष, डाळिंब,ऊस ही नगदी पिकं गेली. पैशाच्या हिशोबात नगदी…
मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता कमी नरेंद्र मोदी पंतप्रधान न होण्याच्या शक्यता भाजपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळतील आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असं माध्यमं एकत्रितपणे सांगत आहेत. भाजपला जास्त जागा मिळण्याला मोदी यांची प्रतिमा आणि कर्तृत्व कारणीभूत आहे, मोदी खूप लोकप्रिय असून एक लाट आहे असं माध्यमं सांगत आहेत. माध्यमातून दिसतय की मोदी हा एकांडा शिलेदार रथ घेऊन निघाला आहे. भाजपमधले फारच कमी लोक त्यांच्याबाजूनं प्रचार करताना, भाषणं करताना दिसतात. उलटपक्षी भाजपमधले काही नेते त्यांच्या बाजूचे नाहीत असं माध्यमं दाखवत…
जास्तीत जास्त लोकांना ऊच्च शिक्षण मिळावं असा विचार सरकार करत आहे. खाजगी पैसे आणि सरकारचा ताबा यांच्या मिश्रणातून ते साधायचा सरकारचा विचार आहे. भारतात शिक्षणावर सरकारचा संपूर्ण ताबा आहे. शिक्षण कसं असावं, शिक्षक किती आणि कोणत्या जातीतले आणि कोणत्या प्रकारचे असावेत हे सरकार ठरवतं. विषय, अभ्यासक्रम, शिक्षणक्रम याही गोष्टी सरकार ठरवतं. संस्था चालवण्यासाठी येणारा खर्च कसा झाला पाहिजे हेही सरकारनं ठरवलं आहे. फी किती आकारायची हेही सरकार ठरवतं. सरकारच्या या आणि अनंत इतर अटी मान्य असतील तरच शिक्षण संस्था कोणालाही…
सहाराचे सुब्रतो रॉय निदान काही काळ तरी तुरुंगात आहेत. साधनहीन लोकांना खोटी आमिषं देऊन त्यांच्याकडून पैसे घेतले. ते बहुतांशी लबाडीच्या प्रकल्पांमधे गुंतवून पुन्हा लोकांना शेंड्या लावल्या. असं करत करत दहा वीस वर्षाच्या काळात रॉयांची संपत्ती लक्ष करोड रुपयांच्या घरात गेली. याच्या कित्येक पट कमी संपत्ती गोळा करण्यासाठी टाटा घराण्याच्या काही पिढ्या खर्च झाल्या. मेहनत न करता, समाजाच्या आर्थिक विकासाचे प्रस्थापित दर ओलांडून, कायद्याच्या मर्यादा ओलांडून, पटकन श्रीमंत व्हावं असं माणसांना वाटतं. अगदीच म्हणजे अगदीच अपवादात्मक माणसं एकट्याच्या प्रयत्नानं, कमीत कमी…
लातूरचे रविंद्र गोवंडे, एक सात्विक, सज्जन, निस्वार्थी आणि बहुगुणी माणूस. रविंद्र ऊर्फ नाना गोवंडे ऊर्फ गोवंडे सर वयाच्या ८२ व्या वर्षी लातूर इथे वारले. ते सिविल इंजिनियर होते. सरांना पैसे मिळवण्यात रस नव्हता. घर चालवावं लागतं, घरात मुलं बाळं असतात, दररोज भाकर तुकडा लागतो म्हणून नाईलाजानं ते पैसे मिळवत असत. केलेल्या कामासाठी कोणाकडं पैसे मागणं त्यांना अवघड जात असे. घर, दुकान किंवा इमारतीचं डिझाईन करून झाल्यावर कित्येक माणसं पैशाचं विचारतच नसत. मग आतून गोवंडे वहिनी खुणावून सरांना पैशाचं बोला असं…
केजरीवाल आता खोल पाण्यात उतरत आहेत. आता ते गंभीर राजकीय, आर्थिक भूमिकांकडं सरकत आहेत. आतापर्यंत ते भ्रष्टाचार या एका परीनं सर्वाना मान्य असणाऱ्या गोष्टीबद्दल बोलत होते. वीज, पाणी, शिक्षण या गोष्टी सर्वांना मिळाल्या पाहिजेत हे त्यांचं मत तसं पाहिलं तर सर्व पक्ष आणि जनतेला मान्य आहे. पण शिक्षण,आरोग्य, वीज, पाणी मिळायचं तर त्यासाठी एकादा आर्थिक-राजकीय विचार हवा. तो कोणता असेल यावर ते बोलत नव्हते. आता ते बोलले आहेत. इथून पुढं त्यांची आणि जनतेची खरी कसोटी सुरू होते. केजरीवाल म्हणाले की…
केजरीवाल
केजरीवाल पहिल्या दिवसापासून म्हणत होते की भ्रष्टाचार कमी करणं हा त्यांचा कार्यक्रम आहे. त्यासाठीच जनलोकपाल विधेयक त्यांना आणायचं होतं. जनलोकपाल विधेयक होणार नसेल तर त्यांना सरकारात रस नाही असं ते म्हणत होते. ते विधेयक त्यांना मांडू देण्यात न आल्यानं त्यांनी राजीनामा दिला. काँग्रेस आणि भाजपचं म्हणणं असं त्यांचा जनलोकपालला विरोध नाही, ज्या वाटेनं ते विधेयक मांडलं त्याला विरोध आहे. ते विधेयक मांडण्याच्या प्रक्रियेवरून केजरीवाल, केंद्र सरकार, काँग्रेस-भाजप, काही वकील यांच्यात मतभेद आहेत. तरीही एक मुद्दा उरतोच. जनलोकपाल विधेयकाचं आश्वासन पूर्ण…
ओबामा जखमी झाले होते तेव्हां बराक ओबामा अध्यक्ष झाल्यानंतरची गोष्ट. म्हणजे 2010 सालातली. ओबामा बास्केट बॉल खेळत होते. खेळतांना रोनाल्डो डेसेरेगाचं कोपर ओबामांच्या तोंडावर आदळलं. जखम झाली. डझनभर टाके पडले. ठीक. अध्यक्षांशी खेळण्यासाठी माणसांची काळजीपूर्वक निवड करणाऱ्यांनी रोनाल्डोला पुन्हा बोलावलं नाही. परंतू ओबामानी आपला फोटो त्या मागं स्वहस्ताक्षरात मजकूर लिहून रोनाल्डोला पाठवला. त्यात लिहिलं होतं ” गड्या. जगातला तू एकमेव माणूस आहेस ज्यानं अध्यक्षाला जखमी केलं परंतू ज्याला अटक झाली नाही. बराक.”
रिलायन्स उद्योग समूहाच्या उद्योगांबद्दल पहिल्या पासून वाद आणि आक्षेप आहेत. उद्योगाला फायदा व्हावा यासाठी या उद्योगसमूहानं कायदे वाकवले, तुडवले, उल्लंघले. हे साधण्यासाठी राजकीय पक्ष, पुढारी, लोकप्रतिनिधी यांचा गैरवापर या उद्योगानं केला आहे. जकाती, कर इत्यादी गोष्टी या समूहाच्या फायद्यासाठी वाकवल्या गेल्या. लोकप्रतिनिधी सामिल असल्यानं समूहावर कोणतीही कारवाई आजवर होऊ शकली नाही. लोकसभेत समूहाच्या उद्योगांवर चर्चा झाल्यावर कायद्यातल्या खोचा वापरून, संसदीय प्रणालीतल्या फटी वापरून समूहाची सुटका करण्यात आली. कम्युनिष्ट पक्षाच्या सदस्यांनी प्रकरण लावून धरलं, इतर पक्ष संसदीय प्रक्रियांच्या मागं लपून, भाषणं…
केजरीवाल
आम्ही आंदोलनही करू आणि सरकारही चालवू हे केजरीवाल म्हणतात. त्यांचं हे विधान गोंधळात टाकणारं आहे, परस्पर विसंगत आहे, बुचकळ्यात टाकणारं आहे. केजरीवाल दोन पैकी नेमकं काय करणार आहेत असा प्रश्न पडतो. हा प्रश्न पडण्याचं कारण आपल्याला आंदोलन करणं आणि सरकार चालवणं या दोन स्वतंत्र, परस्परांना छेद देणाऱ्या गोष्टी वाटत आल्या आहेत. आजवरच्या आपल्या अनुभवावरून ती कसोटी आपण तयार केलेली आहे. केजरीवाल ज्या रीतीनं वर आले, ज्या कोंडीतून आणि गोचीतून वर आले त्याचा प्रभाव त्यांचे विचार आणि कामाची शैली यावर झाला…