Browsed by
Category: लेख

येमेनमधली इस्लामी मारामारी

येमेनमधली इस्लामी मारामारी

येमेनच्या राजधानीवर सौदी अरेबियाची विमानं बाँब हल्ले करत आहेत. त्यांना इजिप्त, कतार, अरब अमिराती या देशांचा पाठिंबा आहे. पाकिस्तानचाही पाठिंबा आहे परंतु पाकिस्ताननं तिथं सैनिक पाठवायचं अजूनपर्यंत टाळलं आहे. सौदी अरेबिया सानामधे घुसलेल्या हुती सरकारला हुसकावण्याच्या प्रयत्नात आहे. गेले काही दिवस उत्तर येमेनमधे बलवान असलेल्या हुती या संघटनेनं येमेनच्या राजधानीचा ताबा घेतला असून साऱ्या येमेनवरच सत्ता मिळवण्याचा हुती या संघटनेचा इरादा आहे.  हुती या संघटनेकडंही भरपूर शस्त्रं आहेत. त्यामुळं लढाई तुंबळ आहे. येमेनी जनतेचं मत  विभागलेलं आहे. हुतीला पाठिंबा असलेले…

Read More Read More

एकादशी- जागतीक दर्जाचा सिनेमा

एकादशी- जागतीक दर्जाचा सिनेमा

एलिझाबेथ एकादशी या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पंढरपूर या गावातल्या एका कुटुंबाच्या जगण्यातले काही दिवस या चित्रपटात आहेत. मध्यम वर्गीय कुटुंब. कुटुंबातला कर्ता माणूस वारला आहे. त्याची पत्नी, आई आणि त्याची दोन मुलं. मुलांची आई स्वेटर विणून, स्वयंपाकाची कामं करून घर चालवते, मुलांना वाढवते. मुलाच्या दिवंगत वडिलानी हौसेनं डिझाईन केलेली एक सायकल आहे. मुलगा ती जिवापाड जपतो. मोठा झाल्यावर, उंची वाढल्यावर, त्याला ती वापरायची आहे.  लोकांकडून कामाचे पैसे न आल्यानं आईचं स्वेटर विणायचं गहाण यंत्रं   बँक जप्त करायला…

Read More Read More

व्यंकटरमण सुब्रमण्यमना नोबेल कां मिळतं, ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष कां होतात?

व्यंकटरमण सुब्रमण्यमना नोबेल कां मिळतं, ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष कां होतात?

व्यंकटरमण सुब्रमण्यम ब्रीटनमधल्या रॉयल सोसायटीचे अध्यक्ष झाले आहेत. त्या आधी२००९ मधे त्यांना मॉलिक्युलर बायॉलॉजी विषयातलं नोबेल पारितोषिक (इतर दोन वैज्ञानिकांसह) मिळालं होतं. या दोन्ही घटना व्यंकटरमण यांचं जगातलं स्थान दाखवतं. वरील दोन्ही गोष्टी त्यांनी अमेरिका आणि ब्रीटनमधे साधल्या.ते वडोदऱ्यात जन्मले, तिथंच त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यांना आयआयटीत प्रवेश हवा होता. मिळाला नाही. त्यांना संशोधन करायचं होतं, त्यांचे आई वडील दोघंही संशोधक होते. व्यंकटरमण अमेरिकेत पोचले. तिथं त्यांनी ओहायो विश्वशाळेत डॉक्टरेट केली. नंतर येल विश्वशाळा, ब्रुकलीन इन्सटीट्यूट या ठिकाणी त्यांनी  मॉलिक्युलर…

Read More Read More

महाराष्ट्रात गायबैल मारण्यावर बंदी

महाराष्ट्रात गायबैल मारण्यावर बंदी

  महाराष्ट्रात गायीबैल मारण्याला बंदी करणारा कायदा झालाय. गायीबैलांचं मांस खाणं हा गुन्हा ठरला आहे. भारतात हिंदूना गायी प्रिय आहेत. गायींना धर्मात देवतेचं स्थान आहे. गायीच्या पोटात ३३ कोटी देव असतात असं हिंदू मानतात. महाभारतात, पुरातन सािहत्यात गायींचे अनंत उल्लेख आहेत.  मागं जाऊन कल्पना करा. उद्योग नव्हते. आजच्या तुलनेत अन्न, वस्त्र, निवारा या अगदी प्राथमिक पातळीवरच्या गोष्टी मिळवत माणूस जगत होता.  गाय दूध देई, दुधापासून तयार होणाऱ्या गोष्टी माणसाला मिळत.  गायी आणि बैलांना गाय जन्म देई. बैल शेतीच्या कामात उपयोगी…

Read More Read More

धर्मातून बाहेर पडण्याची सोय

धर्मातून बाहेर पडण्याची सोय

” आपल्या ब्लॉगवरची २४ डिसेंबर २०१४ ची ‘धर्माचा दरवाजा’ नावाची post वाचली. मला एक प्रश्न बरीच वर्षे सतावतो आहे. जर एखाद्या माणसाला कुठल्याच धर्माचे label नको असेल, तर अशी काय सोय आहे की तो माणूस त्याला जन्माने मिळालेल्या धर्मातून बाहेर पडेल आणि त्यासाठी त्याला दुसरा कोणताही धर्म स्वीकारायला लागणार नाही…?? उदाहरणार्थ: हिंदू कुटुंबात जन्मलेला माणूस हिंदू असतो. त्याला स्वत: विचार करता यायला लागला आणि तो मनाने संपूर्ण नास्तिक झाला. तर अशा वेळी त्याला धर्मात राहून धर्म न पाळणे असा पर्याय…

Read More Read More

पटेल यांना अलाबामातल्या मॅडिसन शहरात पोलिसांनी दुखापत केली.

पटेल यांना अलाबामातल्या मॅडिसन शहरात पोलिसांनी दुखापत केली.

गुजरातमधील पिंज या गावचे श्री पटेल. इंग्रजी लिहिता, वाचता, बोलता येत नाही. त्यांचा मुलगा अमेरिकेतील अलाबामा राज्यातल्या मॅडिसन या गावात रहातो. मॅडिसन या तीस चाळीस हजार लोकवस्तीच्या गावात सुमारे एक हजार भारतीय रहातात. अमेरिकन नसलेले इतरही लोक या गावात रहातात. पटेलांचा मुलगा अमेरिकेत शिकतोय, नोकरी करतोय. त्याला दीड वर्षाचं मूल आहे. मूल सांभाळण्यासाठी पटेल मॅडिसनमधे गेले, त्यांची पत्नी गुजरातेतच राहिली. एके सकाळी सहा वाजता पटेल हिंडायला बाहेर पडले. पटेल रस्त्याच्या कडेला असलेल्या पायवाटेनं फिरत होते. ते पाहून आसपासच्या घरातल्या एका रहिवाशानं…

Read More Read More

स्वयंपाक घरातला आर्किटेक्ट

स्वयंपाक घरातला आर्किटेक्ट

         रविवारची सकाळ. दारावरची घंटी वाजचे आणि शेजारचे जोशी दारात उभे. लांबलचक दाढी. डोक्यावर केस नाहीत. गळ्यात गमछा. हातात वाडगा.          “दामले. हे घ्या.”          सुहास जोशी आर्किटेक्ट आहेत. स्वच्छंदी. जे आवडेल ते करतात. त्यात तुडुंब आनंद मिळवतात. मुंबईतल्या पृथ्वी थेटरमधे एक कॅफे आहे. तिथं जवळ जवळ दररोज संध्याकाळी जाऊन बासरी वाजवत बसतात. तबला आणि तंबोऱ्याची साथ त्यांचं आय पॅड करतं. कधी खांद्यावरच्या पिशवीतून पॅड काढतील आणि समोरच्या माणसाचं स्केच काढतील. आणि रविवारी किवा कधीही सकाळी किवा…

Read More Read More

मोदी, ओबामा, पर्सनल केमेस्ट्री

मोदी, ओबामा, पर्सनल केमेस्ट्री

नरेंद्र मोदींनी बराक ओबामांना मिठ्या मारल्या. ओबामांसोबत जाहीर बोलताना मोदी ओबामांचा उल्लेख बराक बराक असा करत होते. ओबामांशी आपली जवळीक आहे आपण ओबामा यांच्यात एक पर्सनल केमेस्ट्री आहे असं मोदी दाखवत होते.  देशाचे प्रमुख म्हणून कामासाठी, करार करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रपती-पंतप्रधान ही  माणसं एकत्र येतात तेव्हांही ती देशप्रमुख असली तरी मुळात माणसंच असतात.  या माणसांचं आपसात किती जुळतं, भेटीमधे त्यांच्यात किती आपुलकी निर्माण होते, माणसं म्हणून ती एकमेकाच्या किती जवळ येतात याला महत्व असतं. शिखरावरच्या  एकट्या पडलेल्या माणसांचं आपसातलं सूत…

Read More Read More

पुस्तकांची दुनिया

पुस्तकांची दुनिया

मुंबईतला फ्लोरा फाऊंटनचा फूटपाथ. हुतात्मा चौकातल्या हुतात्मा स्मारकाच्या समोरचा कोपरा. इंग्रजी यू आकाराचा फूटपाथ. पाठीमागं इमारतीच्या कंपाउंडच्या लोखंडी सळयांच आणि डोक्यावर ताडपत्रीचं कायम तात्पुरतं छप्पर. फूटपाथवरच पुस्तकावर पुस्तक, त्यावर पुस्तक रचत तीन फूट, चार फूट, पाच फूट उंचीच्या पुस्तकभिंती.   तीन चार दुकानं. भिंतीच नसल्यानं एका दुकानापासून दुसरं दुकान वेगळं ठरवणं कठीण. मालकांनाच ओळखता येतंच आपलं दुकान.  मोजदाद अवघड पण दोन तीन लाख पुस्तकं असावीत असा दुकानदारांचा अंदाज.   १९६० सालाच्या सुमाराला इथं  एकच दुकान होतं. आताच्या दुकानांपेक्षा लहान. मालकाचं नाव…

Read More Read More

केजरीवाल

केजरीवाल

दिल्लीत आम आदमी पार्टी एक नंबरवर निवडून आली. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना हरवून. देशभर एक उत्साहाची लाट उसळली.   आप आणि केजरीवाल हे अण्णा आंदोलनाचे फुटवे होते. अण्णा हजारेनी   केजरीवालना  निवडणूक लढू नका असं सांगितलं होतं. अण्णांचाही गोंधळ होता. एकदा ते केजरीवालना आशिर्वाद देणार म्हणाले एकदा त्याना पाठिंबा देणार नाही म्हणाले. केजरीवालांचं म्हणणं होतं की देशातली व्यवस्था भ्रष्ट असेल तर ती दुरुस्त करणं ही  आपली जबाबदारी  आहे. त्यासाठी  भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानं एक राजकीय पक्ष स्थापून निवडणुक लढवायला…

Read More Read More