गांधीजींना शांततेचं नोबेल कां मिळालं नाही.
१९७४ साली नोबेल कमिटीनं मदर तेरेसा यांना शांततेचं नोबेल पारितोषिक नाकारलं. कारण? मदर तेरेसांना शांततेचं नोबेल पारितोषिक द्यावं असं भारतीय खासदारानी नोबेल कमीटीला १९७४ साली लिहिलं होतं. शांततेचं नोबल अमूक एका माणसाला द्या अशी विनंती कोणीही करू शकतो. संसदेतले लोक, अगदी नगरपालिका, जिल्हा परिषदेचेही लोक तशी विनंती करू शकतात. ब्रीटनमधले भारताचे राजदूत बीके नेहरू यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना लिहिलं की त्यांनी नोबेल कमिटीला मदर तेरेसांना नोबेल द्यावं असं लिहिलं तर त्याचा उपयोग होईल. इंदिरा गांधी विचार करत होत्या. मधल्या…