Browsed by
Category: लेख

गांधीजींना शांततेचं नोबेल कां मिळालं नाही.

गांधीजींना शांततेचं नोबेल कां मिळालं नाही.

१९७४ साली नोबेल कमिटीनं मदर तेरेसा यांना शांततेचं नोबेल पारितोषिक नाकारलं.  कारण? मदर तेरेसांना शांततेचं नोबेल पारितोषिक द्यावं असं  भारतीय  खासदारानी नोबेल कमीटीला १९७४ साली लिहिलं होतं. शांततेचं नोबल अमूक एका माणसाला द्या अशी विनंती कोणीही करू शकतो.  संसदेतले लोक, अगदी नगरपालिका, जिल्हा परिषदेचेही लोक तशी विनंती करू शकतात. ब्रीटनमधले भारताचे राजदूत बीके नेहरू यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना लिहिलं की त्यांनी नोबेल कमिटीला मदर तेरेसांना नोबेल द्यावं असं  लिहिलं तर त्याचा उपयोग होईल. इंदिरा गांधी विचार करत होत्या. मधल्या…

Read More Read More

शार्ले हेबडो

शार्ले हेबडो

 ७ जानेवारी २०१५ रोजी तीन जण एके सत्तेचाळीस घेऊन पॅरिसच्या शार्ली हेबडो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयात घुसले. आतमधे संपादकीय बैठक चालली होती. बैठकीतल्या माणसांना ओळखून, त्यांची नावं घेऊन बंदुकधाऱ्यांनी गोळीबार केला. १२ पत्रकारांना ठार मारलं. मारेकरी होते शेरीफ आणि सईद क्वाची, भाऊ भाऊ. एकानं कारवाईच्या आधी एक व्हिडियो क्लिप पाठवली होती. आपण इराकमधल्या आयसिस या दहशतवादी संघटनेचे आहोत असं तो त्या क्लिपमधे म्हणाला. दुसऱ्यानं पोलिसांच्या गोळ्यांना बळी जाण्याआधी गर्वानं सांगितलं की त्याला येमेनमधल्या अल कायदाच्या शाखेनं या कारवाईसाठी धाडलं होतं. अल…

Read More Read More

भाजप भगवी काँग्रेस होणं ही राजकीय अपरिहार्यता?

भाजप भगवी काँग्रेस होणं ही राजकीय अपरिहार्यता?

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांमधे भाजपनं किरण बेदी यांना दिल्लीच्या भविष्यातील मुख्यमंत्री घोषित केलं आहे. दोनच दिवस आधी त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आणि लगोलग मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार जाहीर झाल्या. पक्षात प्रवेश देणं आणि मुख्यमंत्रीपदाचा इरादा जाहीर करणं या दोन्ही घटनांना भाजपच्या दिल्लीतल्या कार्यकर्त्यांचा आक्षेप होता. पक्षाच्या दिल्ली संघटनेला न विचारता हा निर्णय झाला या बद्दल कार्यकर्त्यांची नाराजी होती. त्यांना पक्षात घेणं आणि मुख्यमंत्री घोषित करणं हे निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतले, पक्षातली इतर माणसं या निर्णयात सहभागी नव्हती. अमीत…

Read More Read More

शेतकरी. शेतमाल. सबसिडी. दागिने.आत्महत्या.

शेतकरी. शेतमाल. सबसिडी. दागिने.आत्महत्या.

शेतकरी. शेतमाल. सबसिडी. दागिने.आत्महत्या. गेलं वर्षंच नव्हे तर दशक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी चिंतित आहे. हज्जारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे काही सुखासुखी घडत नाहीये. शेती करणं, त्यासाठी घेतलेली कर्जं न फिटणं,  फायदा न निघणं यातूनच आत्महत्या होताहेत. शेती तोट्यात आहे या एका वाक्यात आत्महत्येचं कारण सांगता येईल. सरकार खतांवर सबसिडी देतेय. वीज आणि पाणी कमी किमतीत देतंय. शेतीतली काही उत्पादनं हमी भाव देऊन खरेदी करतंय. येवढं सारं करूनही शेतकऱ्याला त्याचा खर्च भागवून चार पैसे उरतील अशा रीतीनं शेती करता येत नाहीये….

Read More Read More

धर्माचा दरवाजा

धर्माचा दरवाजा

इराकमधे आयसिस या इस्लामी दहशतवादी संघटनेनं गावंच्या गावं ताब्यात घेतली,त्यातल्या माणसांना ” आपल्या ” इस्लामचे बंदे व्हा असा आदेश दिलाय. जे हा आदेश पाळणार नाहीत त्यांचा छळ होतो, त्याना ठार मारलं जातं.  आयसिसचा इस्लाम हा जगातल्या इतर रूढ इस्लामांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे तो नेमका कसा आहे आणि वेगळा कां आहे हे नीट समजलेलं नाही. सामान्यतः अल बगदादी हा त्यांचा पुढारी जे म्हणेल ते मान्य करणं असा त्या इस्लामचा अर्थ आहे.  इराकमधले मुस्लीम असोत की ख्रिस्ती की आणखी कोणी. त्या सर्वांना…

Read More Read More

पेशावरची शाळा

पेशावरची शाळा

पेशावरच्या शाळेत सात जिहादींनी 132 मुलं मारली. दोन चोरलेल्या गाड्यांतून जिहादी शाळेत पोचले. पंधरवडाभर आधी पाक-अफगाण सरहद्दीवर त्यांचं प्रशिक्षण झालं होतं, हल्ल्याचं नियोजन झालं होतं. एका अभ्यासवर्गासाठी हॉलमधे जमलेल्या विद्यार्थ्यांवर बेछूट गोळीबार झाला. पळणाऱ्याना पाठून गोळ्या घातल्या. घाबरून थिजून बसलेल्या मुलांवर गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मुलं मेली आहेत की नाहीत ते तपासून त्यात जिवंत आढळलेल्यावर गोळ्या झाडल्या.  रक्ताची थारोळी आणि प्रेतांचा खच एकदा पाहून झाल्यावर जिहादीनं आपल्या नेत्याला फोनवरून विचारलं ” मुलं मारून झालीत, आता काय करू.” पलिकडून उत्तर…

Read More Read More

ताराबाई मेढेकर

ताराबाई मेढेकर

औरंगाबादच्या ताराबाई मेढेकर गेल्या. मेढेकर गाडीचं एक चाक, अप्पा मेढेकर, काही दिवसांपाठीच निखळलं. ताराबाईंच्या निधनानं दुसरंही निखळलं. जगात कोणाचंही काहीही बाकी न ठेवता ताराबाई गेल्या. सारं बेबाक करून गेल्या. ताराबाईंचा संसार मोठा होता. दीर, नणंदा, मुलं सर्वांचे संसार उभे करण्यासाठी त्या कंबर कसून उभ्या होत्या. लग्नं, डोहाळे जेवणं, बारशी, शिक्षण, सणसोहळे, आजार पाजार, संकटं. प्रत्येक गोष्टीत त्या न बोलता, आनंदानं उभ्या असत. ही झाली त्यांच्या नात्यातली, सख्खी माणसं. अप्पासाहेबांमुळं, हैदराबाद स्वातंत्र्य  चळवळीमुळं तयार झालेली नाती वेगळीच. किती तरी माणसं. त्यांच्या…

Read More Read More

आर्टिफिशल इंटेलिजन्स

आर्टिफिशल इंटेलिजन्स

आर्टिफिशल इंटेलिजन्स मानवी समाजाचा नाश घडवून आणेल असं पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग म्हणाले आहेत.  कॉन्वर्सेशन नावाच्या एका नियतकालिकात त्यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. माणसानं यंत्राला बुद्दीमत्ता दिल्याचा हा परिणाम आहे असं त्यांचं म्हणणं आहे.  यंत्रं म्हणजे काय होतं? एकमेकांत गुंतवलेली दातेरी चक्रं. आसाभोवती फिरणारी चाकं. पुढं मागं किंवा गोलाकार फिरणारे दट्ट्ये. हातानं नाही तर विजेवर चालवलेली यंत्रं. एकादं यंत्रं सूत कातत असे.एकादं यंत्रं कापड विणत.एकादं यंत्रं चाक फिरवत असे. एकादं यंत्रं भोकं पाडत असे. एकादं यंत्रं वस्तू जुळवत असे किंवा…

Read More Read More

आता गीता

आता गीता

गीता हे एक राष्ट्रीय पुस्तक आहे असं सांगण्याची आवश्यकता होती काय? देशासमोर आर्थिक प्रश्न आहेत. दुष्काळ होताहेत. दिल्लीत बलात्कार होताहेत. खूप महत्वाचे प्रश्न लोंबकळत असताना या लोकांना हे असले उद्योग कसे करावेसे वाटतात. एक गीता प्रेस नावाचा छापखाना आहे. दर वर्षी तो गीतेच्या हज्जारो प्रती छापतो. गीता प्रेसला दुसरं काहीही छापायला वेळ सापडत नाही इतक्या गीतेच्या प्रती छापल्या जातात. गीतेच्या लाखो प्रती खपत असतात.  महाराष्ट्रात गीताईच्या हज्जारो प्रती खपत असतात. ज्ञानेश्वरी ही मराठीतली गीता आहे. ज्ञानेश्वरांनी त्यांना उमगलेली गीता लोकांसमोर,…

Read More Read More

स्थानिक पक्षांशी युती

स्थानिक पक्षांशी युती

भाजप आणि सेनेचं सरकार स्थापन झालं आहे. मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हां कुरबूर करत दोन्ही पक्ष एकत्र होते. नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जागावाटपात मतैक्य न झाल्यानं दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. मोदी यांनी प्रचाराचा झंझावात केल्यानंतर, मोदींना विरोध करत करत सेनेनं ६३ माणसं निवडून आणली. विधानसभेत भाजपला बहुमत मिळालं नाही.  राष्ट्रवादीचा बेभरवशाचा पाठिंबा भाजपनं घेतला. मंत्रीपदांवरून भाजप-सेनेत संघर्ष झाला. विधानसभेत अल्पसंख्य रहाण्याचा अर्थ सरकार कधीही कोसळू शकलं असतं. म्हणजे पुन्हा निवडणुका आणि पुन्हा जुनीच कोंडी.  सेनेची अस्मिता-अस्तित्व आणि…

Read More Read More