कावळे आत्मनिर्भर असतात
कावळे आत्म निर्भर असतात. कावळे एका मर्यादित भूभागात जन्मतात, वाढतात, मरतात. ते आपला भूभाग सोडून जात नाहीत. अन्न मिळत नाही किंवा घरटं बांधायला जागा मिळत नाही म्हणून कावळे शेजारच्या तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात जात नाहीत. कावळे पालिकेच्या कचऱ्याच्या ट्रकवर बसून कचऱ्यातलं अन्न उचलतात. कचऱ्याचा ट्रक त्यांचा रहाता विभाग सोडून गेला की कावळे ट्रकबरोबर जात नाहीत; ट्रक सोडतात आणि आपल्या भागात परततात. कावळ्यांच्या गरजा मर्यादित असतात. घरट्यासाठी एकाद चौरसफूट जागा पुरते. अगदी मोजकंच खातात. ताजंच अन्न पाहिजे, अन्न शुद्ध असलं पाहिजे…