पाकिस्तानातलं धर्मनिंदा प्रकरण
पाकिस्तानचा धर्मनिंदा कायदा, त्या कायद्याचा वापर, त्याचा अमल इत्यादी गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत, आसिया बीबीला पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयानं निर्दोष ठरवून सोडल्यावर. आसिया बीबीवर खटला झाला होता, तिनं धर्मनिंदा केली म्हणून. खालच्या दोन न्यायालयांनी तिला दोषी ठरवून फाशी जाहीर केल्यावर २००९ मधे ती तुरुंगात गेली. खटला सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयानं तिची सुटका केली. त्यानंतर घडलेलं रामायण नंतर पाहूया. पण त्या आधी घटना काय होती ते पाहूया. आसिया बीबी नानकाना जिल्ह्यातल्या गावात शेतमजुरी करत असे….