Browsed by
Month: April 2019

एनरॉन. भारतात गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, त्यांची चौकशीही टाळता येते.

एनरॉन. भारतात गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, त्यांची चौकशीही टाळता येते.

एनरॉनच्या दाभोळ प्रकल्पाची चौकशी  सर्वोच्च न्यायालयानं थांबवलीय. १९९६ साली सुरू केलेल्या या चौकशीला आता अर्थ नाहीये असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं.   एक तर चौकशी सुरु झाली होती ती एनरॉनबरोबर महाराष्ट्र राज्य वीज मंडळानं केलेल्या खरेदी करारातील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी. आता एनरॉन दाभोलमधे नाही, दोन सरकारी उपक्रम मिळून दाभोल वीज निर्मिती केंद्र चालवतात. मूळ आरोपीच गायब. दुसरं म्हणजे शरद पवार, बाळ ठाकरे, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी अटल बिहारी वाजपेयी यांच्या वर्तनाची चौकशी न्यायालयीन चौकशीत व्हायची होती. त्या पैकी आता फक्त शरद…

Read More Read More

दोन हजारांची वस्ती चाळीस हजार पुस्तकं

दोन हजारांची वस्ती चाळीस हजार पुस्तकं

सू हेलपर्न न्यू यॉर्क राज्यातल्या एका डोंगरी खेड्यात रहायला गेल्या.   गाव आकारानं मोठं होतं पण माणसं होती फक्त २ हजार. २ हजार माणसं २ हजार चौरस मैलाच्या परिसरात पसरलेली. डोंगराळ वस्त्या अशाच असतात. एक डोंगर, खूप अंतरावर दुसरा डोंगर, मधे घळ. डोंगरावर किवा घळीत एकादं घर. दुसरं घर दिसतही नाही इतक्या अंतरावर. एकोणिसाव्या शतकात या गावात चामडी कमावण्याचे उद्योग होते, लाकूड कारखाने होते. गावात रोजगार मिळालाच तर मोसमी स्वरुपाचा असे. औद्योगीक अमेरिका श्रीमंत झाली पण दूरवर असलेल्या खेड्यांची स्थिती…

Read More Read More

अरे बाबा, राफेल हा देशसेवेचा मामला आहे

अरे बाबा, राफेल हा देशसेवेचा मामला आहे

राफेल प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं उकरलं आहे. हिंदू या पेपरानं बाहेर काढलेली माहिती आता सर्वोच्च न्यायालय तपासणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा राफेलची चर्चा होणार आहे. मुख्य विषय असा की राफेल विमानाच्या नेमक्या किमती काय, कितीनं वाढल्या, आणि कां वाढल्या. ही माहिती गुप्तता कायद्यानुसार लोकांसमोर ठेवता येत नाही असं सरकार म्हणालं. ही माहिती जाहीर झाली तर भारताच्या सुरक्षिततेला धोका आहे असं सरकारचं म्हणणं आहे.   जनतेला, विरोधी पक्षांना भारत सरकारनं राफेल खरेदी करायला हवं आहे, त्या खरेदीला कोणाचाही विरोध नाही. त्या विमानात शस्त्रास्त्रं…

Read More Read More

उतरणीवरचा भाजप. २०१९ ची निवडणूक वैचारिक घुसळण व ध्रुवीकरणाची सुरवात ठरावी.

उतरणीवरचा भाजप. २०१९ ची निवडणूक वैचारिक घुसळण व ध्रुवीकरणाची सुरवात ठरावी.

काँग्रेस या स्वातंत्र्य आंदोलनाचा जन्म १८८५ साली झाला. नाना विचार, नाना धर्म, नाना पंथ, नाना व्यक्तिमत्व काँग्रेस चळवळीत सामिल झाली. स्वातंत्र्य मिळालं आणि १९४७ साली काँग्रेस हा राजकीय पक्ष निर्माण झाला. माज आणि भ्रष्टाचार याची लागण १९५५ पासूनच सुरु झाली होती. नेहरू, शास्त्री व अन्य चारित्र्यवान आणि विचार करणाऱ्या नेत्यांनी पक्ष सावरला होता. ते गेले आणि घसरण सुरु झाली. इंदिरा गांधीनी पक्षाच्या घसरणीला गती दिली. व्यक्तिगत स्वार्थ आणि त्याला सिद्दांताची तकलुपी जोड यांचा वापर त्यानी केला. १९६७ साली काँग्रेसला झटका…

Read More Read More