Browsed by
Month: April 2016

वाचकांना पुस्तकांकडं नेणारा आणि पुस्तकांना वाचकांकडं नेणारा राम अडवाणी

वाचकांना पुस्तकांकडं नेणारा आणि पुस्तकांना वाचकांकडं नेणारा राम अडवाणी

राम अडवाणी बुक सेलर  (लखनौ, १९५२) या दुकानाचं आता काय होईल? दुकानाचे मालक राम अडवाणी वयाच्या ९५ व्या वर्षी परवा वारले. त्यांचा मुलगा रानीखेतमधे असतो, नात लंडनमधे असते. ते राम अडवाणी पुस्तक दुकान पुढं चालवणार? समजा त्यांच्या मुलानं आणि नातीनं ते चालवायचं ठरवलं किंवा कोणी ते विकत घेतलं तरी ते  ‘ राम अडवाणींचं पुस्तकांचं दुकान ‘  रहाणार?  राम अडवाणी यांचं पुस्तकांचं दुकान ही लखनौच्या संस्कृतीची एक लक्षणीय ओळख आहे.  राम अडवाणी मुळातले पाकिस्तानातले. फाळणीनंतर भारतात आले.  पाकिस्तानात त्यांचं पुस्तकाचं दुकान…

Read More Read More

स्टालीनच्या खुल्या छळछावणीत जगणाऱ्या संगितकाराची गोष्ट

स्टालीनच्या खुल्या छळछावणीत जगणाऱ्या संगितकाराची गोष्ट

The Noise Of Time. Author : Julian Barnes Publisher : Knopf ।। दी नॉईज ऑफ टाईम ही ज्युलियन बार्नस या मॅनबुकर बक्षिस विजेत्याची ताजी कादंबरी.  दिमित्री शोस्टाकोविच (१९०६-१९७५) या रशियन संगीतकाराच्या जीवनावर आधारलेली. शोस्टाकोविचनं अनेक ऑपेरा लिहिले, सोलो पियानो मैफिली केल्या, संगीत रचलं, चित्रपटांना संगित दिलं. त्यानं दिलेल्या सिनेमा संगिताला एकदा ऑस्करचं नामांकन मिळालं होतं.शोस्टाकोविच युरोप आणि अमेरिकेत गेला, तिथं भाषणं केली, संगीत सादर केलं. काही संगीत समीक्षकांनी त्याला ग्रेट म्हटलं, काहींनी दुय्यम दर्जाचा ठरवलं. सोवियेत युनियनच्या सरकारांनी त्याला अनेक…

Read More Read More

मीठ तयार करणाऱ्या कुटुंबाची गोष्ट

मीठ तयार करणाऱ्या कुटुंबाची गोष्ट

माय नेम ईज सॉल्ट. ।। नजर पोचेस्तवर दिसणारी उजाड जमीन.डोंगर नाही. झाड नाही. घर नाही. एकही प्राणी नाही. एकही माणूस नाही. वर तळपणारा सूर्य, खाली रखरखीत जमीन. एक बाईक. मग बाईकपाठून येणारा एक ट्रक. ट्रकवर पाच सात माणसं. बाजलं. पत्रे. पिंपं. भांडीकुंडी. बांबू. माणसं घर बदलतात तेव्हां असं सामान ट्रकवर लादून नेतात. माणसं कुठल्या नव्या घरात निघालीत? समोर तीनशेसाठ अंशात एकही घर दिसत नाहीये.  ट्रक थांबतो.  उजाड आसमंत. ट्रकमधली माणसं खाली उतरतात. ट्रकवरचं सामान उतरवतात. बांबू उभे करून, पत्रे जोडून…

Read More Read More

पठाणकोट, पाकचा दहशतवाद आणि भारताचं पाक विषयक धोरण

पठाणकोट, पाकचा दहशतवाद आणि भारताचं पाक विषयक धोरण

 पठाणकोट, पाकचा दहशतवाद आणि भारताचं पाक विषयक धोरण. पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारत पाक शांतता चर्चा तूर्तास स्थगित असल्याचं पत्रकारांना सांगितलंय. ९ नोव्हेंबर २०१५ साली ही चर्चा परदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी सुरु केली होती. काश्मिरचा मुद्दा वगळून चर्चा होऊच शकत नाही;  बलुचिस्तानमधल्या बंडाला भारत चिथावणी देत आहे असे आरोप बासित यांनी केले.  चर्चा स्थगितीचं तात्कालिक कारण होतं पाकिस्तानी टीमचा पठाणकोट दौरा.     पाकिस्तानी दौऱ्याच्या बदल्यात भारताचा दौरा असं काहीही ठरलेलं नव्हतं असं बासित म्हणाले.   २०१५…

Read More Read More