प्रस्थापित पक्षांची दिवाळखोरी

प्रस्थापित पक्षांची दिवाळखोरी

प्रस्थापित पक्षांची दिवाळखोरी आणि केजरीवाल

बरखा दत्त यांनी
एनडीटीव्ही या वाहिनीवर केजरीवाल यांची दीर्घ मुलाखत घेतली. आप पक्षाबद्दल
लोकांकडून घेतल्या जाणारे आक्षेप दत्त यांनी मांडले. विरोधी पक्षा  या बुरख्यामागं दडून बरखांनी माध्यमांना वाटणारे
आक्षेपच मांडले. अनेक मुद्द्यांवर केजरीवालांनी स्पष्टीकरणं दिली. त्यातले लक्षणीय
असे काही मुद्दे.
1. ” मी डावा किंवा उजवा
नाही. मला डावं, उजवं म्हणजे काय ते समजत नाही. मला येवढंच समजतं की लोकांना पाणी
हवंय,वीज हवीय, पारदर्शकता हवीय, सुशासन हवंय.” केजरीवाल यांच्या या भूमिकेमुळंच आधीचा राजकारणाचा
अनुभव नसतांनाही मतदारांनी त्यांना व त्यांच्या पक्षाला भरघोस मतं दिली. त्यांचं
हे मत चर्चा मार्तंड आणि घनघोरविचारवंत मंडळींना पटणारे नाहीत. डावे आणि उजवे
केजरीवाल यांना कसं काहीही समजत नाही, त्यांना वैचारिक पातळी नाही वगैरे गोष्टी ते
उत्तम प्रकारे मांडतील. विचारधारावाल्यांनाबाजूला सारून केजरीवांना मतदारांनी
निवडून दिलं हे कसं समजून घ्यायचं?
2. दिल्लीत एका
परदेशी महिलेवर बलात्कार झाला. केजरीवाल विचारतात की याची जबाबदारी कोणावर? पोलिस किंवा प्रशासनात कोणावर तरी याची जबाबदारी असायला हवी की नाही? आदर्श प्रकरण झालं. भ्रष्टाचार झाला हे तर उघड आहे. परंतू कोणावरही
जबाबदारी टाकून त्यांना शासन करणं जमत नाहीये. नोकरशहा म्हणतात की पुढाऱ्यांची
जबाबदारी. पुढारी म्हणतात नोकरशहांची जबाबदारी. विचारवंत म्हणतात की एकूण समाजच
सडलेला असल्यान सर्व समाजाचीच जबाबदारी. मधल्या मधे आदर्श घडतय, बलात्कार होताहेत,
खून होताहेत, बेकारी वाढतेय त्याचं काय करायचं? या
घोळातून वाट काढण्यासाठी केजरीवल यांनी एसएचओ स्तरावरच्या पोलिस अधिकाऱ्याला
जबाबदार ठरवलं आहे, त्यांचं निलंबन करून कारवाई करा अशी मागणी केली आहे. पोलिस
खातं आणि गृह खातं त्याला तयार नाही. शेवटी कोणावर तरी जबाबदारी टाकून त्या
माणसाकडून पैसे वसूल व्हायला हवेत, त्या माणसाला तुरुंगाची हवा द्यायला हवी.  हेच नेमकं आपल्या देशात घडत  नाही. ना काँग्रेसला  ते जमलं ना भाजपला. त्यामुळंच गुन्हेगार मोकाट
सुटलेले आहेत. कायदा असून नसल्यासारखा आहे. केजरीवाल यांनी पहिल्या प्रथमच योग्य
रीतीनं प्रश्न धसाला लावला आहे. प्रस्थापित व्यवस्था ऐकत नाही म्हटल्यावर केजरीवाल
मुख्यमंत्री असूनही चौकात धरणं धरणार आहेत. तर बरखा दत्त त्यांना  विचारतात की सत्ताधारी असूनही तुम्ही आंदोलन
कां करता. मग त्यांनी काय करावं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *