केजरीवाल

केजरीवाल

आम्ही आंदोलनही करू
आणि सरकारही चालवू हे केजरीवाल म्हणतात. त्यांचं हे विधान  गोंधळात टाकणारं आहे, परस्पर  विसंगत आहे, बुचकळ्यात टाकणारं आहे.
केजरीवाल दोन पैकी
नेमकं काय करणार आहेत असा प्रश्न पडतो. हा प्रश्न पडण्याचं कारण आपल्याला आंदोलन
करणं आणि सरकार चालवणं या दोन स्वतंत्र, परस्परांना छेद देणाऱ्या गोष्टी वाटत
आल्या आहेत. आजवरच्या आपल्या अनुभवावरून ती कसोटी आपण तयार केलेली आहे. केजरीवाल
ज्या रीतीनं वर आले, ज्या कोंडीतून आणि गोचीतून वर आले त्याचा प्रभाव त्यांचे
विचार आणि कामाची शैली यावर झाला आहे. समाजात काहीही करायचं असेल तर सत्ता ही एक
अटळ वाट आहे, त्या वाटेनं जाणं योग्य आहे, त्यासाठी सरकार चालवलं पाहिजे असं
त्यांना वाटतं. परंतू समाज आणि राज्यव्यवस्था, समाजव्यवहार आणि राज्यव्यहार ज्या
रीतीनं तयार झाले आहेत त्यात सरकार लोकाभिमुख चालवणं अशक्य आहे हेही अनुभव
सांगतोय. यामधून कशी वाट काढणार? कोणालाच माहीत नाहीये. ही एक अज्ञात काळोखी जागा
आहे. त्या बद्दल अनुभव नसल्यानं कसोट्या तयार झालेल्या नाहीत. त्यामुळं गोंधळ
होतो.
केजरीवाल आणि आपण
सगळेच त्या गोंधळात आहोत. केजरीवाल या गोंधळातून वाट काढण्यासाठी सक्रीय झाले
आहेत, लोक अजून सक्रीय नाही, निरीक्षक आहेत. ते वाट शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, लोकांनीही
वाट शोधण्यात सहभागी व्हायला हवं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *