दहशतवादाचा मुकाबला. सक्षम यंत्रणा नव्यानं उभारावी लागेल
आधीच्या
ब्लॉगमधे भारत सरकार आणि पोलिटिकल एस्टॅब्लिशमेंट दहशतवादाचा मुकाबला करण्यात कां अपेशी
ठरते ते लिहिलं होतं. सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं, भारत सरकारचे विविध विभाग दहशतवादाच्या
मुळाचा छडा लावत नाहीत, तशी यंत्रणा भारत सरकारजवळ नाही असं त्या ब्लॉगमधे लिहिलं होतं.
ब्लॉगमधे भारत सरकार आणि पोलिटिकल एस्टॅब्लिशमेंट दहशतवादाचा मुकाबला करण्यात कां अपेशी
ठरते ते लिहिलं होतं. सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं, भारत सरकारचे विविध विभाग दहशतवादाच्या
मुळाचा छडा लावत नाहीत, तशी यंत्रणा भारत सरकारजवळ नाही असं त्या ब्लॉगमधे लिहिलं होतं.
स्वातंत्र्यापासून
तर १९९० पर्यंत पाकिस्तान सरकार लष्कराचा वापर करून भारताशी लढत होतं. १९९० नंतर पाकिस्ताननं
जैशे महंमद, लष्करे तय्यबा यासारख्या खाजगी टोळ्या तयार केल्या, त्याना शस्त्रं दिली,
प्रशिक्षण दिलं, पैसे दिले. काश्मिरात आणि
भारतात त्या दहशतवादी टोळ्या पाठवायला सुरवात केली. या कामी अमेरिका आणि सौदी अरेबिया
यांच्याकडून मिळालेले पैसे आणि शस्त्रं पाकिस्ताननं वापरली.
तर १९९० पर्यंत पाकिस्तान सरकार लष्कराचा वापर करून भारताशी लढत होतं. १९९० नंतर पाकिस्ताननं
जैशे महंमद, लष्करे तय्यबा यासारख्या खाजगी टोळ्या तयार केल्या, त्याना शस्त्रं दिली,
प्रशिक्षण दिलं, पैसे दिले. काश्मिरात आणि
भारतात त्या दहशतवादी टोळ्या पाठवायला सुरवात केली. या कामी अमेरिका आणि सौदी अरेबिया
यांच्याकडून मिळालेले पैसे आणि शस्त्रं पाकिस्ताननं वापरली.
पाकिस्तानच्या
दहशतवादी कारवाया लक्षात आल्यावर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला नव्यानं सुरक्षा विचार
करणं आवश्यक होतं. पाकिस्तानातली माहिती मिळवणं, मुळातच त्या दहशतवाद्यांना निष्प्रभ
करणं या दिशेनं विचार करायला हवा होता. त्यासाठी इंटेलिजन्स विभागाची नव्यानं उभारणी
करण्याची आवश्यकता होती. वेळ पडल्यास सीआयए, मोसाद इत्यादी संघटना ज्या रीतीनं शत्रूचं
निराकरण करतात त्याचा विचार करायला हवा होता. सरकारनं ते केलं नाही. परराष्ट्र खातं
आणि भारतातली इंटेलिजन्स यंत्रणा यांच्याच आधारे त्यांनी दहशतवाद हाताळण्याचा प्रयत्न
केला. भारत सरकार बहुतांशी इतरांच्या मदतीवर अवलंबून होतं. अमेरिका इत्यादीनी गोळा
केलेली माहिती वापरणं आणि अमेरिकन सरकारवरच त्यानी पाकिस्तानवर कारवाई करावी असा दबाव
आणणं या वाटेनं भारत सरकार जात राहिलं.
दहशतवादी कारवाया लक्षात आल्यावर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला नव्यानं सुरक्षा विचार
करणं आवश्यक होतं. पाकिस्तानातली माहिती मिळवणं, मुळातच त्या दहशतवाद्यांना निष्प्रभ
करणं या दिशेनं विचार करायला हवा होता. त्यासाठी इंटेलिजन्स विभागाची नव्यानं उभारणी
करण्याची आवश्यकता होती. वेळ पडल्यास सीआयए, मोसाद इत्यादी संघटना ज्या रीतीनं शत्रूचं
निराकरण करतात त्याचा विचार करायला हवा होता. सरकारनं ते केलं नाही. परराष्ट्र खातं
आणि भारतातली इंटेलिजन्स यंत्रणा यांच्याच आधारे त्यांनी दहशतवाद हाताळण्याचा प्रयत्न
केला. भारत सरकार बहुतांशी इतरांच्या मदतीवर अवलंबून होतं. अमेरिका इत्यादीनी गोळा
केलेली माहिती वापरणं आणि अमेरिकन सरकारवरच त्यानी पाकिस्तानवर कारवाई करावी असा दबाव
आणणं या वाटेनं भारत सरकार जात राहिलं.
मुत्सद्देगिरी
आणि वाटाघाटी या वाटेनं भारत सरकारनं दहशतवाद हाताळण्याचा प्रयत्न केला.
आणि वाटाघाटी या वाटेनं भारत सरकारनं दहशतवाद हाताळण्याचा प्रयत्न केला.
परिणाम
असा की दहशतवादाला भारत सरकार आळा घालू शकलं नाही.
असा की दहशतवादाला भारत सरकार आळा घालू शकलं नाही.
या
बाबत आजच्या इंडियन एस्क्सप्रेसमधे प्रवीण स्वामी यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याची
लिंक सोबत जोडत आहे. त्यावरून लक्षात येतं की मुंबईवरच्या हल्ल्याची माहिती परदेशी
यंत्रणांकडून मिळत होती. ती पुरेशी नव्हती. माहिती मिळवण्यासाठी त्यांना विनवणी करावी
लागत होती. तरीही ते माहिती देत नव्हते. मिळालेल्या माहितीचा उपयोग मुंबई पोलिस करू
शकले नाहीत.
बाबत आजच्या इंडियन एस्क्सप्रेसमधे प्रवीण स्वामी यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याची
लिंक सोबत जोडत आहे. त्यावरून लक्षात येतं की मुंबईवरच्या हल्ल्याची माहिती परदेशी
यंत्रणांकडून मिळत होती. ती पुरेशी नव्हती. माहिती मिळवण्यासाठी त्यांना विनवणी करावी
लागत होती. तरीही ते माहिती देत नव्हते. मिळालेल्या माहितीचा उपयोग मुंबई पोलिस करू
शकले नाहीत.
परदेशी
यंत्रणेनं पाकिस्तानातून दहशतवाद्यांची बोट निघाल्याची माहिती दिली. भारतीय रॉनं त्याची दखल घेऊन सुरक्षा व्यवस्था केली.
नंतर ती बोट पुन्हा पाकिस्तानकडं वळल्यावर रॉला वाटलं की आता हल्ला होणार नाही. त्यांनी
सुरक्षा व्यवस्था गुंडाळली. घडलं होतं ते असं की दहशतवाद्यांनी एक बोट हायजॅक केली
आणि मुळ बोट सोडून दिली. त्यामुळं हायजॅक केलेल्या बोटीनं दहशतवादी मुंबईत पोचले. मुंबई
पोलिस अशा हल्ल्याला तोंड देण्यास सक्षम नव्हते. त्यामुळं पुढं काय झालं ते जगानं पाहिलं
आहे.
यंत्रणेनं पाकिस्तानातून दहशतवाद्यांची बोट निघाल्याची माहिती दिली. भारतीय रॉनं त्याची दखल घेऊन सुरक्षा व्यवस्था केली.
नंतर ती बोट पुन्हा पाकिस्तानकडं वळल्यावर रॉला वाटलं की आता हल्ला होणार नाही. त्यांनी
सुरक्षा व्यवस्था गुंडाळली. घडलं होतं ते असं की दहशतवाद्यांनी एक बोट हायजॅक केली
आणि मुळ बोट सोडून दिली. त्यामुळं हायजॅक केलेल्या बोटीनं दहशतवादी मुंबईत पोचले. मुंबई
पोलिस अशा हल्ल्याला तोंड देण्यास सक्षम नव्हते. त्यामुळं पुढं काय झालं ते जगानं पाहिलं
आहे.
शेकडो
माणसं मारली गेली.
माणसं मारली गेली.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/david-headley-mumbai-attack-2611-7-years-on-india-waits-for-west-intelligence-on-isi-links/#sthash.Q1qBcFbc.dpuf
3 thoughts on “दहशतवादाचा मुकाबला. सक्षम यंत्रणा नव्यानं उभारावी लागेल”
Nice blog
informative blog
दामले साहेब, सध्या गाजत असलेले जे.एन.यु. वर तुमचे मत वाचण्यास उत्सुक आहे