जिहादी आणि जैन    
सध्या एकाच
वेळी घडणाऱ्या घटना.
       इराकमधे
आयसिस या जिहादी संघटनेनं त्यानी मिळवलेल्या टीचभर प्रदेशात खलिफाची, म्हणजे
प्रेषितांच्या प्रतिनिधीची, म्हणजे इस्लामची खिलाफत जाहीर केली आहे.
ती साऱ्या जगात करायची त्यांची इच्छा आहे. या खिलाफतमधे स्त्रिया बुरख्यात वावरतील, त्याना
घरात रहावं लागेल, समाजात मद्य नसेल, समाजात
संगित-चित्रपट-नाटक इत्यादी नसेल.
       गुजरातेत
पालिताणा नावाचा एक भाग आहे. तिथं जैनांची धार्मिक स्थळं आहेत. असा पालिताना पूर्ण
मांसाहारमुक्त करायचं गुजरात सरकार ठरवतंय,
त्याला सध्याच्या भारत
सरकारची मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
       मुंबईत
मरीन लाईन्स परिसरात खूप जैन रहातात. त्यांना तो विभाग मांसाहारमुक्त करायची इच्छा
आहे, तसे दबाव त्यांनी सुरु केले आहेत. मुंबईत अन्यत्र
रहाणारे जैन आपल्या इमारतींत मांसाहार करणाऱ्यांना येऊ देत नाहीत. मरीन लाइन्सला असणाऱ्या
इराणी हॉटेलांना हाकलून लावायचा जैनांचा विचार आहे.
       गोव्यातले
भाजपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी म्हटलंय की तोकडे आणि कमी कपडे घालणाऱ्या स्त्रियांच्यामुळं
गोव्याची संस्कृती बिघडत आहे. श्रीराम सेनेचे मुतालिक यांनी पब संस्कृतीमुळं हिंदू
संस्कृती धोक्यात आल्याचं म्हटलंय आणि त्यांनी ढवळीकरांना पाठिंबा दिलाय.
       माणसानं
काय खावं आणि कोणते कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याची जबरदस्ती होता
कामा नये. काही जैन साधूंना नागडं फिरावंसं वाटतं म्हणून उद्या मरीन लाईन्समधे कपडेही
घालायला बंदी करतील. जैनांचे साधू कमी कपडे घालतात आणि हिंदू साधू स्त्रियांनी कमी
कपडे घालू नये म्हणतात. आणि तिकडं जिहादी म्हणतात की स्त्रीनं तर पूर्णपणे झाकून घ्यावं.
आयसिसच्या स्त्रीकपडे fवषयक मागणीला श्रीराम सेनेचा पाठिंबा.
( आम्ही कुठं बुरखा घाला म्हणतोय. आम्ही पुरेसे कपडे घाला म्हणतोय. असं सेनेचं म्हणणं
असण्याची शक्यता आहे.)
       कपडे, खाणं
पिणं, लिहिणं वाचणं,
नाटक करणं, संगित
ऐकणं, सिनेमे काढणं पहाणं, फूटबॉल
किंवा हुतूतू विटी दांडू खेळणं हा ज्याच्या त्याच्या आवडी निवडीचा भाग आहे. त्यालाच
संस्कृती असं म्हणतात.  माणसाच्या या सर्व क्रियांमधे
उपासना नावाची एक क्रिया आहे. तिला धर्म म्हणता येईल. संस्कृतीमधे धर्म हा एक घटक असतो, असू
शकतो. यावर धर्मवाल्यांचं म्हणणं की देव,उपासना यांच्या भोवतीच जग उभारलेलं असल्यानं
धर्माचार हा मॅक्रो व्यवहार आणि संस्कृती हा त्याचा एक भाग. ही धर्म आणि संस्कृती यातली
मारामारी आहे. ती चालत राहील.
       यातला
मुख्य मुद्दा आहे तो धर्म-संस्कृती या दोन्ही गोष्टी ऐच्छिक असायला हव्यात, त्याची
जबरदस्ती करणं बरोबर नाही. एकीकडं पालिताणा मांसाहार मुक्त करणं, गुजरात
मद्यमुक्त करणं ही जबरदस्ती आहे. दुसरीकडं मद्य घेतलंत, मांसाहार
केलात तर पाप होतं, देव तुमचं वाईट करतो, तुम्हाला
रोग लागतात, तुम्हाला पुढला जन्म मगर, कुत्रा, डुक्कर, साप
किवा तत्सम मिळू शकतो अशी भीती घालणं ही सुद्धा जबरदस्ती आहे. एकविसाव्या शतकापर्यंत
या दोन्ही जबरदस्त्या लादल्या-पाळल्या गेल्या. पण आता ते खरं नाही हे लक्षात आलंय.
तसं करण्याचा प्रयत्न केला तर काय होतं हे जिहादी कारभार, हिटलरचं
राज्य, रशियातलं कम्युनिष्ट राज्य यातून माणसाला कळलंय.
       मोकळेपणा, स्वातंत्र्य, सहनशीलता
या मुद्द्यांवर आधारलेला लोकशाहीचा िवचार उपकारक आहे हे आता समजू लागलंय. तो विचार
अधिक कार्यक्षम, कमीत कमी दोषपूर्ण करणं याकडं लक्ष द्यायला
हवं.

       

2 thoughts on “

  1. सामान्यतः मोकळेपणा आणि स्वातंत्र्य ह्याच दोन गोष्टींचा पुरस्कार किला जातो. त्यासोबत सहनशीलता हवी ह्याचा बऱ्याचदा सोयीस्करपणे विसर पडतो. तिन्ही गोष्टींचे सहअस्तित्व असायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *