सुनील तांबे म्हणत आहेत की अण्णा अजून
संदर्भहीन (irrelevant ) झालेले नाहीत. कुणी विचारतंय की अण्णांचं काय चाललंय.
     अण्णांच्या बाबतीत अनेकवेळा गोंधळ उडतो तो
त्यांच्या राजकीय भूमिकांमुळं. ममता बानर्जींना दिलेला पाठिंबा,सभेला कमी गर्दी
झाली म्हणून पाठिंबा काढून घेणं या गोष्टी त्यांचं एक लंगडं राजकीय अंगं दाखवतात.
     प्रश्न असा येतो की अण्णांकडं कसं पहायचं.
     देशाला भ्रष्टाचारा वीट आला होता, देशाला एक
असहाय्यता जाणवत होती. अण्णांच्या भ्रष्टाचारविषयक भूमिकांमधे लोकांना आपलं म्हणणं
प्रतिबिंबित झाल्याचं दिसलं. देशभरच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. राजकीय
पक्षातल्या लोकांनीही. कारण त्यानाही त्यांच्या पक्षातला अती भ्रष्टाचार बोचत
होता.
     जोवर भ्रष्टाचाराचा छळवाद तीव्र असेल तोवर
अण्णा irrelevant होणार नाहीत.
     समाजाला भ्रष्टाचार नकोय पण दुसऱ्या बाजूला
त्यांना एक सामान्यतः सुखी करणारं राजकीय-आर्थिक धोरण हवंय. ते अण्णांकडून मिळणं
कठीण कारण ते अण्णांचं कसब, क्षमता नाही.
     समाजानं काय करावं? अण्णांच्या
भ्रष्टाचार विरोधी संघर्षाला पाठिंबा द्यावा आणि दुसऱ्या बाजूनं राजकीय पक्षांवर योग्य
राजकीय-आर्थिक धोरणांसाठी दबाव आणावा. विविध राजकीय पक्षांतल्या बौद्धिक-वैचारिक
दिवाळखोर पुढाऱ्यांना निवडणुकीत पाडावं, त्यांना अडगळीत टाकावं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *