प्रस्थापित पक्षांची दिवाळखोरी
प्रस्थापित पक्षांची दिवाळखोरी आणि केजरीवाल बरखा दत्त यांनी एनडीटीव्ही या वाहिनीवर केजरीवाल यांची दीर्घ मुलाखत घेतली. आप पक्षाबद्दल लोकांकडून घेतल्या जाणारे आक्षेप दत्त यांनी मांडले. विरोधी पक्षा या बुरख्यामागं दडून बरखांनी माध्यमांना वाटणारे आक्षेपच मांडले. अनेक मुद्द्यांवर केजरीवालांनी स्पष्टीकरणं दिली. त्यातले लक्षणीय असे काही मुद्दे. 1. ” मी डावा किंवा उजवा नाही. मला डावं, उजवं म्हणजे काय ते समजत नाही. मला येवढंच समजतं की लोकांना पाणी हवंय,वीज हवीय, पारदर्शकता हवीय, सुशासन हवंय.” केजरीवाल यांच्या या भूमिकेमुळंच आधीचा राजकारणाचा अनुभव नसतांनाही…