Browsed by
Author: niludamle

युरोपातलं अटळ स्थलांतर, अडचण आणि आव्हान

युरोपातलं अटळ स्थलांतर, अडचण आणि आव्हान

ऐलान कुर्डी या छोट्या मुलाचं निश्चेष्ट शरीर समुद्राच्या किनाऱ्यावर वाळूत पडलेलं जगानं पाहिलं. खळबळ उडाली.  ऐलान कुर्डी, त्याचा भाऊ गालिब, त्याची आई रेहान आणि पिता अब्दुल्ला कुर्डी हे मुळचे कुर्डिस्तानचे रहिवासी.  कुर्डिस्तान तुर्कस्तान, इराक, इराण,  आर्मेनिया  या देशांच्या सीमांवर पसरलेला आहे. इस्लाम येण्याच्या आधी  कुर्डांची स्वतंत्र संस्कृती होती, स्वतंत्र उपासना पद्धती होत्या. इस्लाम स्विकारायला कुर्डांनी विरोध केला होता. इस्लामी राज्यकर्त्यांनी त्यांना जबरदस्तीनं अंकित केलं, सुन्नी केलं. काही कुर्ड शिया झाले.  धर्मांतर झालं तरी कुर्डांची संस्कृती मुळातलीच राहिली. अरब, तुर्की, पर्शियन…

Read More Read More

पटेल आरक्षण. मूळ प्रश्न टाळून जातींच्या आरक्षणाचा घातक शॉर्ट कट.

पटेल आरक्षण. मूळ प्रश्न टाळून जातींच्या आरक्षणाचा घातक शॉर्ट कट.

गुजरातेत हार्दिक पटेल यांनी पाटीदार (पटेल) समाजासाठी आरक्षण मागितलंय. गुजरातेत पटेलांचं प्रमाण नेमकं किती आहे ते कळत नाही, १६ ते २० टक्के आहे असं विविध स्त्रोत सांगतात. पटेल म्हणजे शेतकरी. मुळातले मेहनती शेतकरी. काळाच्या ओघात  इतर आर्थिक क्षेत्रात पसरत गेले. व्यापार, उद्योग, वैद्यकी-कायदे इत्यादी व्यवसायात पसरत गेले. श्रीमंत झाले. अमेरिका आणि ब्रिटन पटेलांनी काबीजच केला आहे. अमस्टरडॅमची  डिरेक्टरी उघडली तर शहा आणि पटेलांची नावं सर्वात जास्त आहेत.  काही कुटुंबं श्रीमंत आहेत पण बहुसंख्य कुटुंबं कठीण परिस्थितीत जगतात. अनेक पटेल शेतकरी…

Read More Read More

आरक्षणाचा बीजबिंदू हार्दिक पटेल.

आरक्षणाचा बीजबिंदू हार्दिक पटेल.

हार्दिक पटेल. वय २२. २६ ऑगस्ट २०१५ या दिवशी जगाला माहित झाले. त्या दिवशी पाच सात लाखापेक्षा जास्त माणसं त्यानं अहमदाबादेत भरवलेल्या सभेत सामिल झाली. त्या आधी एक महिना,  आणखी आधी सहा महिने, आणखी आधी वर्षभर हार्दिक पटेल अनामत आंदोलन चालवत होते, गावोगाव सभा घेत होते. आठवडाभर आधी सुरतेत घेतलेल्या सभेला दोनेक लाख माणसं गोळा झाली तिथून हार्दिक पटेल फॉर्मात आले. अहमदाबादेतली सभा म्हणजे सर्वोच्च बिंदू.  (  अनामत हा आरक्षण या शब्दाला गुजराती प्रतिशब्द. गुजरातीत नेता या शब्दाला आगेवान असा…

Read More Read More

शिवचरित्र, बाबासाहेब पुरंदरे, सरकारी पुरस्कार आणि भंकस वाद

शिवचरित्र, बाबासाहेब पुरंदरे, सरकारी पुरस्कार आणि भंकस वाद

महाराष्ट्र भूषण प्रकरणाचे कंगोरे.  बाबासाहेब पुरंदरे यांनी शिव चरित्र लिहिलं. कीर्तनकार, प्रवचनकाराच्या शैलीत शिवचरित्र सांगितलं. शिवचरित्राचं नाटक किंवा  इवेंट या रुपात ‘जाणता राजा’ सादर केला.   शिवाजी मांडताना  त्यांनी इतिहासाचा आधार घेतला. त्यासाठी  अकॅडमिक इतिहास, बखरी, आठवणी, पोवाडे, स्तोत्र, काव्यं इत्यादी साधनं अभ्यासली.  बाबासाहेब पुरंदरे शिवाजीच्या प्रेमात होते. शिवाजीचं महात्म्य लोकांसमोर मांडायचा ध्यास त्याना होता. शिवाजीचा येवढा प्रभाव त्यांच्यावर होता की दैनंदिन जगण्यातही ते मुजरा करत, रोजमर्रा घटनांमधेही शिवाजीचे दाखले देत.  कोणाही व्यक्तीबद्दल सामान्यतः पन्नास ओळींपुरतीच माहिती सामान्य माणसांपर्यंत पोचते….

Read More Read More

तंदूरबाबा उत्तरार्ध

तंदूरबाबा उत्तरार्ध

 तंदूरबाबा आश्रम.  मंडपाच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर तंदूरबाबा बसला आहे. गुबगुबीत. देखणा. मानेवर रुळणारे केस. उघडा बंब.  त्याच्या भोवती एकशेऐंशी कोनात बारा पुरोहित उभे आहेत. पुरोहितांच्या मागे  पुरुषभर उंचीची चांदीची पिंपं आहेत. पिंपाला कमंडलू लटकले आहेत. दूरवर दोन खांबांना एक मोठा फलक लटकावलेला आहे. त्यावर ‘ शीतोष्ण अभिषेक सोहळा ‘ असे शब्द लिहिलेले आहेत. मंडपात दहाएक हजार माणसं जमलेली आहेत. सगळ्या वयाची.  तरुणींचा भरणा लक्षात रहाण्यासारखा. छतावर कॅमेरे लटकेलेल आहेत. वर्ल्ड कपच्या मॅचेसमधे घारीसारखे फिरणारे कॅमेरे वापरले जातात. तीच टेक्नॉलॉजी इथं…

Read More Read More

तंदूरबाबाची गोष्ट- पूर्वार्ध.

तंदूरबाबाची गोष्ट- पूर्वार्ध.

तंदूरबाबा नगरमधलं  शीतोष्ण देवाचं मंदिर. सव्वाशे एकराचा परिसर. एक गावच म्हणाना. मधोमध एक मंदीर. मीनाक्षी मंदिराची आठवण व्हावी असं आर्किटेक्चर.  मंदिराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला एक भव्य मंडप. पक्क्या सिमेंट स्लॅबचा. मंडपाला दीडेकशे खांब सहजच असावेत. खांबांवर शृंगाराची शिल्पं. पाणी  पिण्याच्या लोट्याच्या आकाराचे गोलाकार स्तन, स्तन हाताळणारी माणसं. त्या खाली अनेक स्त्रिया आणि अनेक पुरुषांचा सांघिक समागम. फूटभर लांबीची शिश्नं हाताळणाऱ्या स्त्रिया. समागमावर आकाशातून पुष्प वृष्टी करणारे स्त्री पुरुष, देव असल्यागत. त्यांच्या चेहऱ्यावर कौतुकाचा भाव.  मंडपात सहज पन्नास साठ हजार…

Read More Read More

मुल्ला उमरच्या मृत्यूचं रहस्य

मुल्ला उमरच्या मृत्यूचं रहस्य

मुल्ला उमर दोन वर्षांपूर्वी वारला असं अफगाणिस्तान सरकारनं पाकिस्तानी सरकारचा हवाला देऊन ३० जुलै २०१५ रोजी जाहीर केलं. बीबीसीवर ही बातमी प्रसिद्ध झाली तेव्हां कोणाचाच या बातमीवर विश्वास बसला नाही. त्याच्या मृत्यूच्या बातम्या अनेक वेळा आल्या पण कोणतेच पुरावे कधी समोर आले नव्हते.  मुल्ला उमरसारखा नेता मेल्याची बातमी दोन वर्षं लपून कशी राहू शकते? पुरावे कां सादर झाले नाहीत? मुल्ला उमर खरोखरच मेलाय की ही एक मुद्दाम पसरवलेली अफवा आहे?  केवळ बीबीसी बातमी देतेय म्हणून त्या बातमीवर विश्वास ठेवणं भाग…

Read More Read More

याकूबची फाशी. एक गोंधळ.

याकूबची फाशी. एक गोंधळ.

याकूब मेमनची फाशी पार पडली. त्याच्या शरीराचं दफन पार पडलं. ३० जुलैच्या सकाळी सात वाजायच्या आत  फाशी व्हायची होती आणि ३० जुलैच्याच पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सर्वोच्च न्यायालय शिक्षेच्या कायदेशीर प्रोसिजरची चर्चा करत होतं. खटल्याची सुनावणी नीट झाली नाही, शिक्षा झाल्याचं आरोपीला आधी कळवलं नाही या मुद्द्यावर फाशी पुढं जाऊ शकत होती. तिकडं नागपूरच्ला तुरुंगाधिकारी  फाशीचा दोर ठीकठाक आहे ना याची शहानिशा करत होते, याकुबला पहाटे उठवायची तयारी करत होते, सर्वोच्च न्यायालयातल्या निकालाची वाट पहात जागत होते.  सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फॅक्सनं…

Read More Read More

काश्मिर प्रश्न समजायला मदत करणारं दुलाट यांचं पुस्तक

काश्मिर प्रश्न समजायला मदत करणारं दुलाट यांचं पुस्तक

अमरजित सिंग दुलाट यांचं काश्मिर, दी वाजपेयी इयर्स हे पुस्तक प्रसिद्ध झालंय. अनेक गोष्टी त्या पुस्तकात आहेत. नेते आणि दहशतवादी यांची व्यक्तिचित्रं त्यात आहेत. काश्मिरी माणसाचा एक्सरे त्यात आहे. काश्मिर प्रश्नाची गुंतागुंत आणि त्यावरचे संभाव्य उपायही या पुस्तकात आहेत. काश्मिरी लोकांना ना पाकिस्तानात जायचय ना हिंदुस्तानात. त्यांना स्वतंत्र रहायचं आहे. पाकिस्तान आणि भारत या दोघांनाही पाकिस्तान त्यांच्यात हवंय. पाकिस्तानला अर्ध काश्मिर मिळालंय, उरलेलं अर्ध त्यांना बळकावायचंय. आपल्यात असलेलं काश्मिर आपल्यातच रहावं इतपत भारताची इच्छा आहे. नरसिंह राव यांनी जाहीर केलं…

Read More Read More

व्यापम. भुसभुशीत जमीन. त्यावर इमले बांधणारे भुसभुशीत इंजिनियर.

व्यापम. भुसभुशीत जमीन. त्यावर इमले बांधणारे भुसभुशीत इंजिनियर.

मध्य प्रदेशात चाळीसेक माणसांचे मृत्यू माध्यमांनी व्यापम घोटाळ्याशी जोडले आहेत. कोणाचा हृदय विकारानं मृत्यू झालाय, कोणी दारूचा डोस जास्त झाला म्हणून मेलंय, कोणी आत्महत्या केलीय. मध्य प्रदेश सरकारचे गृहमंत्री बाबुलाल गौर यांची यातल्या काही मृत्यूंबद्दलची प्रतिक्रिया अशी- ‘ माणसं मरतच असतात. माणसाला हार्ट अटॅक येत असतो. जगण्यातल्या तणावामुळं माणसं आत्महत्या करत असतात. नेहमीच अशा गोष्टी घडत असतात. ‘ मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान म्हणाले ‘ झालेले मृत्यू दुःखद आहेत पण ते व्यापम घोटाळ्याशी जोडणं योग्य नाही.’ दोन मृत्यूंचे तपशील असे. ८ जानेवारी…

Read More Read More